सरकारी भूमीवरील बेकायदेशीर धार्मिक स्थळे ६ महिन्यांत हटवा !

केरळ सरकार या आदेशाद्वारे हिंदूंची धार्मिक स्थळे तात्काळ हटवेल; मात्र राजकीय स्वार्थ, तसेच मुसलमानांचा विरोध यांमुळे अन्य धर्मियांची बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटवण्याची शक्यता अल्प आहे. याकडे न्यायालयाने लक्ष द्यावे, असे जनतेला वाटते !

पुणे येथे शनिवारवाडा परिसरात बेवारस पिशवी आढळली !

शनिवारवाड्यात एक बेवारस पिशवी आढळून आली. बाँबची अफवा पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. शनिवारवाडा परिसराची बाँबशोधक आणि नाशक पथकाकडून पडताळणी करण्यात आली.

रायगडावर मूलभूत सुविधा मिळण्यासाठी ६ जूनपासून आमरण उपोषण करणार ! – ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी का करावी लागते ? प्रशासनाला गडावरील असुविधा दिसत नाहीत का ?

सातारा जिल्हा प्रशासन विशाल अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या सिद्धतेत !

पुणे येथील कार अपघात प्रकरणातील वेदांत अग्रवाल याचे वडील उद्योगपती विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे अनधिकृत एम्.पी.जी. रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट सातारा जिल्हा प्रशासन लवकरच सीलबंद करण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली आहे.

आर्.टी.ई. प्रवेश प्रक्रियेचे अर्ज स्वीकारण्यास ४ जूनपर्यंत मुदतवाढ !

खासगी शाळेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना विनामूल्य प्रवेश (आर्.टी.ई.) प्रक्रिया २०२४-२५ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीमध्ये ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

हेरगिरी करणार्‍या उपग्रहाची चाचणी करणार्‍या उत्तर कोरियाचा अमेरिकेकडून निषेध

काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने हेरगिरी करणारा उपग्रह प्रक्षेपित केला होता; मात्र त्याचा स्फोट झाला. यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीच्या बैठकीत अमेरिकेने उत्तर कोरियाचा निषेध केला.

अभिनेता सलमान खान यांच्या हत्येसाठी पाकिस्तानातून हत्यारांची खरेदी !

सलमान खान यांच्या गाडीवर आक्रमण करण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौघांना अटक केली आहे.

अकोल्यात छेड काढणार्‍या तरुणाला प्रतिकार केल्याने तरुणीवर स्क्रूड्रायव्हरने आक्रमण !

कायद्याचे भय नसलेल्या या तरुणांना तत्परतेने कठोर शिक्षा झाली, तर तरुणीला न्याय मिळेल !

राज्य दुष्काळात होरपळत असतांना कृषीमंत्री विदेशात गेल्याने वडेट्टीवारांची टीका !

शेतकर्‍यांना बियाण्यांसाठी रांगेत उभे करून ते स्वतः मात्र थंड हवेच्या ठिकाणी गेले आहेत. राज्याला लुबाडण्याचे काम चालू असून सत्ताधार्‍यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात दुष्काळाची भयावहता !

अनेक शहरांना १५ दिवसांनी पाणी मिळत आहे. आचारसंहिता असल्याने पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे, चारा छावण्या अद्याप चालू झालेली नाहीत. मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर असून अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे हानी झाली आहे.