देहली, उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथे भूकंप !

राजधानी देहलीसह उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्‍यांमध्‍ये ३ ऑक्‍टोबर या दिवशी भूकंपाचे धक्‍के जाणवले. देहली-एन्.सी.आर्. या भागात दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी झालेल्‍या भूकंपाची रिश्‍टर स्‍केलवर ४.६ इतकी तीव्रता नोंदवली.

पावसाने झोडपले : नद्यांना उधाण, कोकण रेल्वे सेवा ठप्प

गोवा राज्यात आणि शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सलग दुसर्‍या दिवशीही चालूच होता. जोरदार वारे आणि पाऊस यांच्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. संक्षिप्त वृत्तांत देत आहोत.

गोव्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

गोव्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अतीवृष्टीची चेतावणी दिल्याने प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. कुशावती, म्हादई आदी नद्या दुथडी भरून वहात आहेत.

वादळी वार्‍यासह पावसाने गोव्याला झोडपले : जनजीवन विस्कळीत !

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडल्याने संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित ! दक्षिण कोकण आणि गोव्याची किनारपट्टी या भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने १ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे झाड पडून २ युवकांचा जागीच मृत्यू

‘अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहर आणि परिसरातील धोकादायक स्थितींविषयी प्रशासनाला वेळोवेळी जाणीव करून दिली जाते; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते.’’

नागपूर येथील ढगफुटीची माहिती असूनही हवामान विभागाने ती न सांगितल्‍याची चर्चा !

असे असेल, तर विभागातील संबंधित उत्तरदायी अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे !

नागपूरच्‍या पूरस्‍थितीला उत्तरदायी कोण ?

‘निसर्गाचा कोप म्‍हणायचा ? कि नियोजनशून्‍यतेचा शाप ?’ नदीपट्ट्यांतील बांधकामांना बंदी, नैसर्गिक नाले चालू करणे आणि अनधिकृत बांधकामे अन् अतिक्रमणे कायमची हटवल्‍यानंतरच पावसाळ्‍यातील नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांची सुटका होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

नागपूर येथे ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप !

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागांतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. बसस्थानकामधील बस पाण्यात बुडल्या. 

गोव्यात आजपासून जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

राज्यात चालू हंगामात आतापर्यंत एकूण ११८ इंच पाऊस पडला असून पावसाने सरासरी लक्ष्य पार केले आहे. आता पडणारा पाऊस अतिरिक्त असेल ! ऐन गणेशचतुर्थीच्या काळात अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने लोकांना मूर्ती विसर्जनात अडथळा निर्माण होत आहे.

वर्ष २०३० पर्यंत आर्क्टिक महासागरातील हिमनद्या नष्ट होण्याची शक्यता !

भारतात वादळी पाऊस आणि पूर यांची शक्यता वाढली आहे. जंगलांचा र्‍हास होत आहे. पावसामुळे भूमी वाहून जात असून नद्या तुडुंब भरत आहेत.