श्रीमन्नारायण असता त्राता । साधका नसे कसली चिंता ॥

हात सतत स्वच्छ धुवूया । बाहेर जातांना मास्क लावूया । शासन निर्देशांचे पालन करूया।
घरी राहूनी राष्ट्रकर्तव्य बजावूया । श्रीकृष्ण असता आपला भ्राता । साधका नसे कसली चिंता ॥

संभाव्य आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन इमारतीत तिसर्‍या माळ्याच्या वर असलेली सदनिका विकून तळ ते तिसर्‍या माळ्यावरील सदनिका घ्या !

आपत्काळात होऊ शकणारी असुविधा लक्षात घेऊन साधकांनी तिसर्‍या माळ्याच्या वर असलेल्या सदनिका विकून तळ ते तिसरा या माळ्यांतील सदनिका घेण्याचा विचार करावा.

रोहिंग्यांचे पुनर्वसन !

भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांचा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न भारतातील आतापर्यंतच्या एकाही पक्षाच्या सरकारने केलेले नाही, ही वस्तूस्थिती आहे. विरोधी पक्षांत असतांना त्यांना देशाबाहेर काढण्याची मागणी करणारे सत्तेत असल्यावर मात्र कठोर आणि युद्धपातळीवर कृती करतांना दिसले नाहीत, हे जनता पहाते आहे.

न्यायाची प्रतीक्षा !

मंदिरे गाडून मशिदी उभारल्याने भक्त आणि ईश्‍वर यांच्यावर झालेला अन्याय दूर होण्यासाठी आज धर्मनिष्ठ हिंदू अन् अधिवक्ते प्राणपणाने लढत आहेत. हिंदूंची मंदिरे पुन्हा त्यांना मिळावीत, यासाठी सरकारने आता कृतीशील व्हावे, हीच हिंदूंची अपेक्षा !

मंदिरे केवळ अर्थार्जनासाठी ?

‘मंदिर’ या शब्दासाठी ‘रोजगार’ आणि ‘श्रद्धा’, असे २ पर्याय असतील, तर कोणता पर्याय निवडला जाईल ? साहजिकच ‘श्रद्धा’ हाच पर्याय असेल, हे अगदी नास्तिकही सांगतील, तर मग मंदिरे उघडण्यासाठी रोजगाराचे पालूपद लावण्याची आवश्यकता हिंदूंना का भासली ?

स्वच्छ प्रशासन कधी ?

भ्रष्ट सरकारी अधिकार्‍यांची सामाजिक स्तरावर उघडपणे ‘छी-थू’ होईल, असे केले तरच भ्रष्टाचाराचे लांच्छन पुसण्याच्या दिशेने जाता येईल. आता ज्याप्रमाणे गुळमुळीत कारवाई होते, तेवढेच चालू रहाणार असेल, तर आपणच आपल्यासाठी मोठा खड्डा खोदत आहोत, हे निश्‍चित !

वाळू तस्करीवर नियंत्रण कधी ?

अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावर वाळू तस्करांकडून सशस्त्र आक्रमण केले जाते. त्यांच्याकडे शस्त्रे कुठून येतात ? महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती या मंडळींना कशी मिळते ? तसेच कायदा-सुव्यवस्था मोडीत काढण्याचे धाडस या लोकांकडे कुठून येते ?

पुन्हा हिंदु राजेशाही !

लोकशाही स्थापन होऊन अवघी काही वर्षेच झाली असतांना आता नेपाळी हिंदूंनी देशात पुन्हा केवळ राजेशाही स्थापित करण्याची नव्हे, तर नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे जनआंदोलने केली जात आहेत आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांसाठी ‘ऑनलाईन सोशल मिडिया प्रशिक्षण शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

फोंडा, गोवा  सध्याच्या काळात सामाजिक माध्यमांचे महत्त्व लक्षात घेता घरबसल्या समाजात राष्ट्र आणि धर्म विषयक जागृती करण्याच्या उद्देशाने नुकतेच धर्मप्रेमी महिलांसाठी ‘ऑनलाईन सोशल मिडिया प्रशिक्षण शिबिर’ घेण्यात आले. या शिबिराचा अनेक धर्मप्रेमी महिलांनी लाभ घेतला.

आसुरी वृत्तीचा कोण ?

हिंदु धर्माचे मर्म लक्षात घेऊन आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करूनच चित्रपट काढावा, अन्यथा हिंदू शांत बसणार नाहीत. धार्मिक इतिहासात फेरफार करणारे हेच हिंदूंच्या दृष्टीने दुष्प्रवृत्तीचे आहेत. अशांना वैध मार्गाने वठणीवर कसे आणायचे, याचे तंत्र हिंदूंना अवगत आहे, हेही संबंधितांनी जाणावे !