बाहेरचे खाणे !
वरचेवर बाहेरचे अन्न ग्रहण केल्यामुळे पोट बिघडते. वेगवेगळे आजार होतात. त्यावर उपाय करण्यासाठी पुन्हा वेगळा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे प्रेमाचा ओलावा असणारे, घरी बनवलेले सात्त्विक अन्नच वेळ, पैसा, आरोग्य, शरीर सार्यांनाच वाचवेल, हे लक्षात घ्या !