Karnataka Congress Arrests Ganpati : बेंगळुरू पोलिसांनी आरोपींप्रमाणे श्री गणेशमूर्ती ठेवली पोलिसांच्‍या गाडीत !

कर्नाटकच्‍या तुघलकी पोलिसांचे कृत्‍य !

श्री गणेशमूर्तीही हिसकावून पोलिसांच्या वाहनात नेत असतांना…

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्‍यातील मंड्या जिल्‍ह्यात असलेल्‍या नागमंगल येथे ३ दिवसांपूर्वी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर मुसलमानांनी पेट्रोल बाँबद्वारे आक्रमण केले होते. या घटनेच्‍या निषेधार्थ राज्‍यातील काँग्रेस सरकारच्‍या विरोधात तीव्र आक्रोश व्‍यक्‍त केला जात आहे.

काँग्रेस सरकारच्‍या पतनाचे संकेत ! – हिंदूंची प्रतिक्रिया

उपस्‍थित गणेशभक्‍तांनी हे काँग्रेस सरकारच्‍या पतनाचे संकेत असल्‍याचे म्‍हटले आहे. हिंदु देवतेचा अपमान करणारे हे सरकार अधिक काळ टिकणार नाही, असा आक्रोश अनेकांनी व्‍यक्‍त केला आहे.

राजधानी बेंगळुरू येथे १३ सप्‍टेंबरच्‍या सायंकाळी येथील हिंदुत्‍वनिष्‍ठांनी आंदोलन करत नागमंगल येथील घटनेचा निषेध केला. या वेळी त्‍यांच्‍या समवेत श्री गणेशमूर्तीही होती. पोलिसांनी या आंदोलनावर कारवाई करत हिंदुत्‍वनिष्‍ठांना कह्यात घेतले. या वेळी पोलिसांनी हिंदूंच्‍या हातून श्री गणेशमूर्तीही हिसकावून घेतली. पोलिसांनी एवढ्यावर न थांबता मूर्तीलाही पोलिसांच्‍या गाडीत ठेवले. यामुळे उपस्‍थित हिंदूंना धक्‍का बसला. या प्रकरणाचे व्‍हिडिओ सर्वत्र प्रसारित होत असून भारतभरातील हिंदू त्‍याचा निषेध करत आहेत.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)


 संपादकीय भूमिका

  • आरोपींना ने-आण करण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या गाडीमध्‍ये श्री गणेशमूर्ती ठेवणारे पोलीस हे भारताचे कि पाकिस्‍तानचे ? काँग्रेसच्‍या राज्‍यात हिंदूंच्‍या देवतांचा असा अवमान होणारी घटना वाचून ज्‍या हिंदूंच्‍या तळपायाची आग मस्‍तकाला जात नाही, ते हिंदूच नव्‍हेत !
  •  अशा प्रकारे मुसलमानांच्‍या श्रद्धास्‍थानांच्‍या संदर्भात पोलीस असे काही करण्‍याची कल्‍पना तरी करू शकतील का ? हिंदूंमधील अतीसहिष्‍णु वृत्तीचाच हा परिपाक आहे. आता हिंदूंनीही बाणेदारपणा दाखवून त्‍यांचे अधिकार मिळवले पाहिजेत, हे लक्षात घ्‍या !
  • कर्नाटकातील हिंदूंनी हिंदुद्रोही काँग्रेसला निवडून दिल्‍याने तिच्‍या पोलिसांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ? या परिस्‍थितीला सर्वस्‍व राज्‍यातील हिंदूच कारणीभूत आहेत, हे आपण स्‍वीकारले पाहिजे !