तुर्कीयेतील भूकंपामुळे पृथ्वीवर ३०० कि.मी. लांब भेगा !

भूकंपामुळे पृथ्वीला दोन मोठे तडे पडले असल्याचे दिसून आले. त्यांपैकी एक तडा १२५ कि.मी. लांबीचा, तर दुसरा तडा त्याहून मोठा आहे.

हलाल अर्थव्यवस्थेविषयी हिंदु समाजात जागृती करणे आवश्यक ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

आज हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून भारताच्या विरोधात प्रचंड मोठे षड्यंत्र चालू असून याविषयी संपूर्ण हिंदु समाज अनभिज्ञ आहे. हेच ही अर्थव्यवस्था वाढण्यामागे महत्त्वाचे कारण आहे.

नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीमध्ये येणार्‍या मंदिरातील श्री हनुमंताला रेल्वे प्रशासनाची नोटीस !

सबलगड तालुक्यामध्ये हनुमान मंदिर या मार्गाच्या मधे येत आहे. ही भूमी रेल्वेची असून त्यावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. यामुळे रेल्वेने थेट श्री हनुमंतालाच नोटीस बजावली आहे.

हिंदुद्वेषी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वाहनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फेकली काळी शाई !

हिंदुद्वेषी विधाने करून समाजामध्ये द्वेष पसरवणार्‍या मौर्य यांच्यावर आतापर्यंत कारवाई होणे आवश्यक होते !

कॅनडात आढळलेली उडणारी वस्तू अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी पाडली !

जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले, ‘मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी बोललो. त्यानंतर अमेरिकेच्या लढाऊ विमानांच्या साहाय्याने ही वस्तू पाडण्यात आली.  कॅनेडियन सैन्य लवकरच या वस्तूचे अवशेष जप्त करून त्याची पडताळणी करील.

विदेशी आक्रमकांनी शहरांना दिलेली नावे पालटा !

वास्तविक अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ येऊ नये. सरकारने याविषयी देशव्यापी मोहीम हाती घेऊन शहरे आणि गावे यांना असलेले मूळ नाव देण्यासाठी कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !

हिंदूंनो, ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घाला ! – श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

प्रारंभी शंखनाद आणि नंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.

जमियतचे नेते मौलाना मदनी यांचा ‘अल्ला आणि ॐ एकच’ असल्याचा दावा !

जैन मुनी लोकेश यांनी त्यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. ‘हे अधिवेशन माणसे जोडण्यासाठी आयोजित केले आहे. त्यामुळे अशा विधानाचे कोणतेही औचित्य नाही’, असे सांगत संतांनी मंच सोडला.

हिंदु राष्ट्राची स्थापना, हा धार्मिक उन्माद नाही ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला शंखनादाने प्रारंभ झाला. व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, रणरािगणी शाखेच्या मुंबई समन्वयक डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे अन् सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक हे उपस्थित होते.

हिंदु देवीदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करा !

उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यादव यांनी ‘रामचरितमानस’ ग्रंथाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. तसेच कर्नाटकमध्ये के.एस्. भगवान यांनी प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांच्याविषयी हीन पातळीवर टीका केली.