केवळ ४ शैक्षणिक संस्थांवर गुन्हे नोंद, वसुलीचे काम चालूच !

केंद्रशासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती लाटून १ सहस्र ८२६ कोटी रुपयांचा घोटाळा वर्ष २०१७ मध्ये उघड झाला. याच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथक नियुक्त करण्यात आले.

कोर्लई (जिल्हा रामनाथ (अलिबाग)) येथील कथित बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद

मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर (आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी) यांच्या नावावर असलेल्या जागेतील कथित १९ बंगल्यांच्या घोट्याळ्याच्या प्रकरणी येथील ग्रामपंचायत अधिकारी, तत्कालीन सरपंच, सदस्य यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे येथे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘रोड शो’ !

येथील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ भाजपच्या वतीने ‘रोड शो’ काढण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि सर्व पदाधिकारी यांमध्ये सहभागी झाले होते.

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाचे पुन्हा अन्वेषण करण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याशी संबंधित अनंत करमुसे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या प्रकरणी राज्य शासनाच्या तपास यंत्रणांना पुन्हा अन्वेषण करण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत.

कणेरी मठातील गायींचा मृत्यू; कारण अस्पष्ट

पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शिरोळ तालुका (जिल्हा कोल्हापूर) समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २६ फेब्रुवारीला हिंदु जनआक्रोश मोर्चा !

हिंदु मुली अन् माताभगिनी, तसेच संस्कृतीचा सर्वनाश करू पहाणार्‍या लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या या सर्व राष्ट्रविघातक समस्यांचा नायनाट करणारा कायदा करावा. हिंदु धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण करावे, या मागणीसाठी २६ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

शक्तीशाली भारतासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता ! – नारायण मूर्ती, ‘इन्फोसिस’चे संस्थापक

‘मेरा भारत महान’ वगैरे जयघोषाने काहीही होणार नाही. भारताला आर्थिकदृष्ट्या शक्तीशाली करण्यासाठी प्रत्येक भारतियाने कठोर परिश्रम करून वक्तशीरपणा आणि प्रामाणिकपणाचा अंगीकार करावा, हा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे संस्थापक श्री. नारायण मूर्ती यांनी केले.

उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथील विकासकामांसाठी निधी संमत

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून उल्हासनगर शहरातील विविध विकासकामांसाठी ४७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या विकासकामांमध्ये रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह समाजमंदिर उभारणे, नाले उभारणी, अभ्यासिका यांसारख्या कामांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यात एका रात्रीत ४ घरफोड्या !

सध्या सातारा जिल्ह्यात दरोडेखोरांनी घरफोड्यांचे सत्र चालू केले असून २३ फेब्रुवारीच्या रात्री जिल्ह्यात ४ ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. खटाव तालुक्यातील ललगुण आणि डिस्कळ, तर सातारा तालुक्यातील निगडी आणि तामजाईनगर, शाहूपुरी येथे या घरफोड्या झाल्या आहेत.

घरकुलासाठी ७ लाख रुपये भरण्याचे सातारा पालिका प्रशासनाचे आदेश !

सातारा येथील मतकर कॉलनीमध्ये झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे प्राप्त व्हावीत; म्हणून ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या अंतर्गत सातारा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ७ लाख रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.