गुरुदास भोसले यांच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ !

५ दिवस चालणार्‍या या पारायण सोहळ्यात माळवाडी, दिव्यनगरी येथील भाविक सहभागी होणार असून ८ एप्रिल या दिवशी पारायण आहे.

केवळ भारतातच ध्वनीक्षेपकावर अजान का ऐकायला मिळते ? – सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल

मी जगातील अनेक ठिकाणी फिरले आहे. आखाती देशांतही गेले आहे. तेथे ध्वनीक्षेपकावर बंदी आहे. मुसलमान देशांत ध्वनीक्षेपकावर अजान ऐकायला मिळत नाही. मग केवळ भारतातच ती का ऐकायला मिळते ?

भेदभाव आणि भ्रष्टाचार हे मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम ! – पंतप्रधान

काही पक्षांनी देशात अनेक दशके मतपेटीचे राजकारण केले. भेदभाव आणि भ्रष्टाचार हे याच मतपेटीच्या राजकारणाचे दुष्परिणाम आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिवसानिमित्ता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

(म्हणे) ‘भारताने रशियाकडून संरक्षण उपकरणांची खरेदी अल्प करावी !’

भारताने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे !

रमझानच्या काळात मुसलमानबहुल भागांतील वीजपुरठ्यामध्ये कपात करू नका !

हिंदूंच्या सणांच्या वेळी वीज पुरवठ्यामध्ये कोणतीही कपात करू नका’, असा आदेश काँग्रेस सरकारकडून कधी दिल्याचे ऐकिवात आहे का ?

राज्यांनी प्राणवायुच्या तुटवड्यामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी दिली नाही ! – केंद्र सरकार

कोरोनाकाळात कोणत्याही राज्य सरकारने अथवा केंद्रशासित प्रदेशाने प्राणवायुच्या (ऑक्सिजनच्या) तुटवड्यामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती अद्याप दिलेली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी ५ एप्रिल या दिवशी संसदेत प्रश्‍नोत्तराच्या सत्रात दिली.

जम्मू-काश्मीरमधील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या संदर्भात ठोस धोरण आखा !

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? घुसखोरांची समस्या अनेक वर्षांपासून असतांना आतापर्यंत राज्य प्रशासनाने असे धोरण आखून त्यांना देशाबाहेर का काढले नाही ?

सरकारी कर्मचारी इरफान शेखचा जामीनअर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळला !

शेख याने आपल्या पदाचा गैरवापर करून मूकबधिर लोकांचे धर्मांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे.

झारखंडमध्ये हिंदु नववर्ष सोहळ्याच्या वेळी ‘जय श्रीराम’चा जयघोष करणारे २ विद्यार्थी निलंबित !

झारखंड भारतात आहे कि पाकिस्तानात ? राज्यात राष्ट्रघातकी विचारसरणीचे झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्यामुळे असले प्रकार वाढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! ज्यांना जय श्रीरामाच्या घोषणा चालत नाहीत, त्यांनी भारतातून चालते व्हावे !

सर्वधर्मसमभाव म्हणणे ही अज्ञानाची परिसीमा !

‘जगात केवळ सर्व धर्मांचा अभ्यास न केलेले हिंदू ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात. बाकी एकाही धर्मातील एकही जण तसे म्हणत नाही. हिंदूंच्या हे लक्षात येत नाही की, ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे ही अज्ञानाची परिसीमा आहे, ‘प्रकाश आणि अंधार समान आहेत’, असे म्हणणे आहे !’