शेतकर्‍यांच्या आंदोलामुळे देशाची प्रतिदिन होत आहे ३ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी ! – सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेतून दावा

काँग्रेसने तिच्या जवळपास ५५ वर्षांच्या सत्ताकाळात शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी कारभार केला असता, तर आज शेतकर्‍यांची स्थिती वाईट झाली नसती !

इंडोनेशियाचे विमान समुद्रात कोसळल्याने ६२ जणांचा मृत्यू

हे विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ४ मिनिटांत समुद्रात कोसळले. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. या सर्वांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक येथे अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार

युवतींवरील अत्याचारांची न संपणारी मालिका ! काँग्रेसने शिक्षणामध्ये धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करून समाजाला साधना शिकवली असती, तर युवतींच्या सुरक्षेचा आज आहे तेवढा प्रश्‍न ऐरणीवर आला नसता !

भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

चर्च’मधील पाद्रयांसमोर ‘कन्फेशन’ (पापांची स्वीकृती) देण्याची पद्धत बंद करा ! – ५ ख्रिस्ती महिलांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

भारतीय चित्रपटात पाद्रयांना चांगले, तर हिंदूंच्या पुजार्‍यांना नेहमीच वाईट दाखवण्यात येते. आता यामध्ये पालट करण्याचे धाडस दिग्दर्शक दाखवतील का ?

आंध्रप्रदेशातील हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांच्या विरोधात ट्विटरवर  #SaveAndhraTemples हॅशटॅग ट्रेंड !

आंध्रप्रदेशातील मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. यामुळे देशभरातून हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे. याच अनुषंगाने ९ जानेवारी या दिवशी धर्माभिमान्यांकडून #SaveAndhraTemples हा ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ करण्यात आला होता.

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांध कसायांकडून गोळीबार

धर्मांध कसाई हेही आतंकवाद्यांप्रमाणे आणि सराईत गुंडांप्रमाणे पोलिसांवर गोळीबार करतात आणि अशांना वाचण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष पुढाकार घेतात !

युद्धापेक्षा तणावामुळे अधिक प्रमाणात होत आहे भारतीय सैनिकांचा मृत्यू !

तणावग्रस्त सैनिक भविष्यात युद्ध पेटल्यास त्याला सक्षमरित्या कसे सामोरे जातील ? भारतातील आतंकवादाला उत्तरदायी असणार्‍या पाकला नष्ट केल्याचा दुष्परिणाम सैनिकांवर होत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय  शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !

मध्यप्रदेशमध्ये दगडफेक करणार्‍यांवर कठोर कारवाई करणारा कायदा होणार

प्रस्तावित कायद्यामध्ये दगडफेक करणार्‍यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. संपूर्ण वसुली संबंधित आरोपींकडून केली जाणार आहे. धार्मिक स्थळांवरून दगडफेक झाली, तर हे धार्मिक स्थळ सरकारकडून अधिग्रहित करण्यात येणार आहे.

पुण्यातील मानाच्या अखिल मंडई गणपती मंदिरातील २० ते २२ तोळे वजनाच्या सोन्याच्या हाराची चोरी

मानाच्या अखिल मंडई गणपती मंदिराच्या लोखंडी दरवाजाची कडी उचकटून चोरट्यांनी मंदिरातील मूर्तीवरील २० ते २२ तोळे वजनाचे सोन्याचे २ हार चोरून नेल्याची घटना ८ जानेवारीच्या पहाटे घडली.