शनिशिंगणापूर येथील शनैश्‍वर देवस्थानचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड

नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्त पदावर अध्यक्षपदी भागवत सोपान बानकर आणि उपाध्यक्षपदी विकास नानासाहेब बानकर यांची निवड करण्यात आली आहे.

नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे आज उद्घाटन

गोवा मनोरंजन संस्थेचे नूतनीकरण केलेले आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि गोवा मनोरंजन संस्थेचा लोगो यांचे उद्घाटन ११ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता संस्थेच्या संकुलात राज्याचे मुख्यमंत्री तथा गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

१ लाख ८५ सहस्र रुपयांची बनावट कृषी औषधे जप्त

विवेकानंद कॉम्प्लेक्समधील बोढे कृषी केंद्रातून १ लाख ८५ सहस्र रुपयांची बनावट कृषी औषधे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे यांनी पोलिसांच्या साहाय्याने जप्त केली.

पेडणे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद, दोघांना अटक

तालुक्यातील दांडोवाडो, मांद्रे येथे बैलांच्या झुंजी आयोजित केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

बंगालमध्ये कोरोनावरील लस सर्वांना विनामूल्य देणार ! – मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांची घोषणा

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘राज्यातील सर्व गरजू नागरिकांना कोरोनावरील लस विनामूल्य देण्यात येईल’, अशी घोषणा केली आहे.

कर्नाल (हरियाणा) येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध

येथील कैमला गावामध्ये भाजपकडून महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याला मुख्यमंत्री खट्टर उपस्थित रहाणार होते. त्या वेळी ही घटना घडली.

लव्ह जिहादच्या प्रकरणात पसार असलेल्या धर्मांधांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश

असा आदेश लव्ह जिहाद प्रकरणी पसार असणार्‍याच नव्हे, तर अटक केलेल्या आरोपीचीही संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने द्यायला हवा, असेच हिंदूंना वाटेल !

औरंगाबादच्या नामांतराची भूमिका शिवसेनेची, सरकारची नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करण्याची शिवसेनेची भूमिका आहे; मात्र काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याला विरोध दर्शवला आहे.

सांगली येथील निवृत्त उपशिक्षणाधिकारी वसंत चौगुले यांचे निधन

सांगली येथील निवृत्त उपशिक्षणाधिकारी वसंत चौगुले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच पालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून काम केले होते. ते साप्ताहिक सनातन प्रभातचे नियमित वाचक, तसेच सनातन संस्थेचे अर्पणदातेही होते.

शेतकर्‍यांच्या आंदोलामुळे देशाची प्रतिदिन होत आहे ३ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी ! – सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेतून दावा

काँग्रेसने तिच्या जवळपास ५५ वर्षांच्या सत्ताकाळात शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी कारभार केला असता, तर आज शेतकर्‍यांची स्थिती वाईट झाली नसती !