(म्हणे) ‘गलवान खोर्‍यातील संघर्षात आमचे ४ सैनिक मृत्यू पावले !’

चीनचे ४० ते ४५ सैनिक ठार झाल्याचा दावा अमेरिका, रशिया आणि अन्य देशांनी केला असतांना कालपर्यंत कुणीही ठार झाला नसल्याचा दावा करणार्‍या चीनची ही स्वीकृती म्हणजे साळसुदपणाच, हे वेगळे सांगायला नको !

उत्तरप्रदेशात मंदिराची भूमी बळकावण्यासाठी देव मरण पावल्याची कागदोपत्री नोंद !

हिंदूंनो, अशा घटनांमुळेच मंदिरांचे सरकारीकरण करण्याचे कारण राज्य सरकारांना मिळते आणि ते मंदिरे नियंत्रणात घेतात, हे लक्षात घ्या !

कोरोनावरील ‘पतंजलि’चे ‘कोरोनिल’ हे औषध प्रभावी असल्याचा योगऋषी रामदेवबाबा यांचा पुन्हा दावा !

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शोधप्रबंध प्रकाशित : आता तरी सरकारने ‘आत्मनिर्भर भारता’च्या पार्श्‍वभूमीवर योगऋषी रामदेवबाबा यांच्या शोधनिबंधाचा अभ्यास करून त्यात तथ्य असल्यास ते समाजापर्यंत पोचवणे आवश्यक !

काश्मीरमध्ये २ चकमकीमध्ये ३ आतंकवादी ठार, तर एक अधिकारी हुतात्मा

एकेका आतंकवाद्याला ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट केल्यावरच तो नष्ट होईल !

पाकच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञातांच्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार

पाकच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञातांनी पाकच्या सुरक्षादलाच्या चौकीवर केलेल्या गोळीबारात पाकच्या अर्धसैनिकदलाचे ४ सैनिक ठार झाले. येथील कोहलू जिल्ह्यातील कहान भागात ही घटना घडली.

अभिनेत्री दीया मिर्झा यांनी स्वतःच्या विवाहामध्ये कन्यादान परंपरा वगळली !

कन्यादान करणार्‍या व्यक्तीच्या मागील १२ पिढ्या, पुढच्या १२ पिढी आणि स्वतःची १ पिढी यांचा उद्धार होतो, असे धर्मशास्त्र सांगते. मात्र फुकाचा पुरोगामीपणा मिरवण्यासाठी अशी टूम सध्या निघाली आहे. हिंदूंनी यापासून सावध रहावे !

राहुल गांधी यांच्या भाषणाच्या वेळी मुसलमानांनी उपस्थित रहाण्यासाठी इमामाकडून फतवा !

काँग्रेससाठी अशा प्रकारचे किती फतवे काढण्यात आले, तरी आता काँग्रेसला शेवटची घरघर लागली आहे, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे !

धारिष्ट्य असेल, तर भारतात नव्हे, तर पाकिस्तानमध्ये खलिस्तान बनवा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, राष्ट्रवादी विचारवंत  

हिंदु सेवा परिषदेच्या वतीने १५ फेब्रुवारी या दिवशी श्री सरस्वतीदेवीचे पूजन आणि व्याख्यानमाला यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कर्नल आर्.एस्.एन्. सिंह आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. श्रीराम काणे यांनीही संबोधित केले.

किल्ले रायगडावर शिवजयंती आणि छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक उत्साहात साजरा !

छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार ३४७ वा राज्याभिषेक सोहळा, तर दिनांकाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ शिवजयंती एकाच दिवशी आली आहे. राज्याभिषेक सोहळ्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कोरोनाशी लढतांना छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळते ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. छत्रपती दैवत का आहेत, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.