पहलगाम (जम्मू-काश्मीर) – येथील आक्रमणातील ४ पैकी २ आतंकवाद्यांना या आक्रमणाच्या वेळी उपस्थित एकता तिवारी यांनी ओळखले आहे. या दोघांनी त्यांना पहलगामला खेचराद्वारे नेले होते. या दोघांनीही तिच्याशी गैरवर्तन केले होते, असेही त्यांनी सांगितले.

एकता यांना या दोघांच्या कृती आधीच संशयास्पद वाटल्या होत्या; म्हणून त्यांनी या दोघांचे चित्रीकरण केले होते. एकता यांनी सांगितले की, खेचर चालक असल्याचा दावा करणारे आतंकवादी त्यांना त्यांच्यासोबत घेऊन जाऊ इच्छित होते; परंतु त्या त्यांच्यासमवेत गेल्या नाहीत. ते वारंवार धर्माशी संबंधित प्रश्न विचारत असे. त्यांनी एकता आणि त्यांचा भाऊ यांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले. जेव्हा एकताने, ‘कुराण वाचत नाही आणि मी रुद्राक्षाची माळ घालते’, असे सांगितले, तेव्हा आतंकवाद्यांनी एकता यांच्याशी गैरवर्तन केले. आतंकवाद्यांनी अजमेरबद्दल विचारले. एकता यांनी त्यांना सांगितले की, त्या कधीही अजमेरला गेल्या नाहीत. मग त्यांनी अमरनाथ यात्रेबद्दल विचारणे चालू केले. त्यातून त्यांना किती लोक आले होते आणि कोण कोणत्या धर्माचे होते हे जाणून घ्यायचे होते.