नवी देहली – पहलगाम येथील आक्रमणानंतर भारताने पाकिस्तानच्या सर्व नागरिकांना परत पाकमध्ये जाण्याचा आदेश दिला आहे. त्यांचा व्हिसा रहित करण्यात आला आहे; मात्र यातून पाकिस्तानी हिंदूंना वगळण्यात आले आहे. दीर्घकालीन भारतीय व्हिसा मिळालेल्या पाकिस्तानी हिंदूंना हा आदेश लागू असणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका माहितीपत्रकाद्वारे या संदर्भात माहिती दिली आहे.
याच वेळी परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना पाकिस्तानला प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. सध्या पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर भारतात परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे.