नवी देहली – यावर्षी १५ एप्रिलपर्यंत १६१ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे, तर अनुमाने ६०० जणांनी शरणागती पत्करली आहे. वर्ष २०२४ मध्ये २९६, तर वर्ष २०२३ मध्ये ५६ नक्षलवादी मारले गेले होते.
वर्ष २०१८ मध्ये ११ राज्यांतील १२६ जिल्हे नक्षलग्रस्त होते. वर्ष २०२४ पर्यंत त्यात घट होऊन ते ३८ झाले. सर्वाधिक प्रभावित ६ जिल्ह्यांपैकी ४ छत्तीसगड, १ महाराष्ट्र, १ झारखंडमध्ये आहेत. उर्वरित ३२ जिल्हे या दृष्टीने ‘मध्यम’ किंवा मर्यादित श्रेणीत मोडतात. आता हे नक्षली आंदोलन काही भागापुरते राहिले आहे.