मंगळुरू (कर्नाटक) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाचे समर्थन करणारी एक ‘पोस्ट’ फेसबुकवर येथून प्रसारित करण्यात आली आहे. याविषयी मंगळुरूच्या कोणाजे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उल्लाळ येथील सतीश कुमार यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. ‘वर्ष २०२३ मध्ये महाराष्ट्रातील पालघरमध्ये तीन मुसलमानांची हत्या झाली होती. पालघर घटनेमुळे काश्मीरमध्ये धर्म विचारून आतंकवाद्यांनी हत्या केली’, असे लिखाण प्रसारित करण्यात आले आहे. या ‘पोस्ट’वर सामाजिक माध्यमांवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांना शोधून काढून पाकिस्तानमध्ये हाकला ! |