पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी स्वीकृती

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान गेल्या ३० वर्षांपासून आतंकवाद्यांना पाठिंबा आणि प्रशिक्षण देत आहे. पाकिस्तान अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांसाठी हे ‘घाणेरडे काम’ करत आहेत, अशी मोठी स्वीकृती पाकिस्तानचे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहेत. ते ब्रिटीश वृत्तपत्र ‘द स्काय’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
🇵🇰 Pakistan trained terrorists for 30 YEARS for Western countries!
Big confession by Pak Defence Minister Khawaja Asif
🇺🇸 This exposes why the US & the West stayed silent while Pak-backed terrorists attacked India — no action, no condemnation.
🇮🇳 Time for India to declare… pic.twitter.com/NHYQGcSUm3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2025
आतंकवाद्यांना पाठिंबा देणे किंवा प्रशिक्षण देणे, ही एक मोठी चूक !
पत्रकार याल्दा हकीम यांनी आसिफ यांना विचारले होते की, ‘आतंकवादी गटांच्या कारवायांसाठी पाकिस्तान उत्तरदायी आहे का?’ यावर ते म्हणाले की, जागतिक शक्तींनी त्यांच्या हितासाठी पाकिस्तानचा वापर केला. आतंकवाद्यांना पाठिंबा देणे किंवा प्रशिक्षण देणे, ही एक मोठी चूक होती. याची शिक्षा आम्ही भोगत आहोत. (अद्याप पाकने कोणतीच शिक्षा भोगलेली नाही. शिक्षा अजून व्हायचीच आहे ! – संपादक) जर आम्ही सोव्हिएत युनियनविरुद्धच्या युद्धात सहभागी झालो नसतो आणि अमेरिकेतील ९/११ च्या (११ सप्टेंबर २००१ या दिवशी न्यूयॉर्कमधील जागतिक व्यापार केंद्राच्या २ इमारतींवरील आक्रमणाच्या) आक्रमणानंतर उद्भवलेली परिस्थिती उद्भवली नसती, तर पाकिस्तानचे चरित्र निष्कलंक असते.
भारत आणि पाक संघर्षाचे परिणाम धोकायदाक होतील !
पहलगाम येथील आक्रमणाविषयी ख्वाजा आसिफ म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चालू झालेला वाद दोन्ही देशांमधील मोठ्या युद्धाचे रूप घेऊ शकतो. भारत जे काही करेल, त्याला पाकिस्तान प्रत्युत्तर देईल. जर गोष्टी चुकीच्या झाल्या, तर या संघर्षाचे परिणाम धोकादायक असू शकतात.
(म्हणे) ‘पहलगाम आक्रमणासाठी भारतच उत्तरदायी !’
आसिफ म्हणाले की, पहलगाम आक्रमणासाठी पाकिस्तान नव्हे, तर भारतच उत्तरदायी आहे. जर भारताने आमच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली, तर पाकिस्तानही त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल. पाकिस्तानकडे प्रत्युत्तर देण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे असल्याने जगाने काळजी करावी. तथापि दोन्ही देश चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवतील.
(म्हणे) ‘लष्कर-ए-तोयबा अस्तित्वात नाही !’
पहलगाममधील आक्रमणाचे दायित्व ‘द रेझिस्टन्स फ्रंट’चे असल्याविषयी विचारले असता आसिफ म्हणाले की, त्यांनी कधीही त्यांचे नावही ऐकले नव्हते. जेव्हा पत्रकाराने त्यांना ही संघटना लष्कर-ए-तोयबाचा एक भाग आहे, असे सांगितल्यावर आसिफ म्हणाले की, लष्कर-ए-तोयबा संघटना आता म्हातारी झाली आहे. ती आता अस्तित्वात नाही.
संपादकीय भूमिका
|