स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केल्यावरून सर्वाेच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना फटकारले !

नवी देहली – आम्ही कुणालाही स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध बाष्कळ बोलण्याची अनुमती देऊ शकत नाही. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि आपण त्यांच्याशी कसे वागतो आहोत? जर तुम्ही भविष्यात असे कोणतेही विधान केले, तर आम्ही स्वतःहून नोंद घेऊ आणि कारवाई करू. स्वातंत्र्यसैनिकांबद्दल दायित्वशून्य विधाने करू नका, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्षानेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह टिपणीवरून फटकारले. या वेळी न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या कनिष्ठ न्यायालयाच्या समन्सला स्थगिती दिली. राहुल गांधी यांना बजावलेले समन्स रहित करण्यास नकार देणार्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशालाही न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
🚫 Stop the reckless remarks on our freedom fighters!
Supreme Court slams Rahul Gandhi over his objectionable comment on Veer Savarkar! ⚖️
🔥 Repeated disrespect can't go unchecked — maybe a stint at Kala Pani, pulling the oil mill like our real heroes did, would teach him the… pic.twitter.com/TE8Jczcecr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2025
१७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेच्या वेळी एका सभेत सावरकरांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर वर्ष २०२३ मध्ये अधिवक्ता नृपेंद्र पांडे यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली केली.
संपादकीय भूमिकाया प्रकरणात राहुल गांधी यांच्या हात-पायात बेड्या घालून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा करून त्यांना कोलू ओढायला सांगितले पाहिजे. तेव्हाच त्यांचे डोके ठिकाणावर येईल ! |