Sharad Pawar : (म्हणे) ‘याआधीही आतंकवादी आक्रमणे झाली; पण धर्माची चर्चा आताच का ?’

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार यांचा प्रश्न

मुंबई – यापूर्वीही आतंकवाद्यांनी आक्रमणे केली. पुलवामा येथेही आतंकवादी आक्रमण झाले होते. तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आजच का होत आहे ? घडले ते वाईट आहे. याला सक्तीने तोंड द्यावे लागेल; पण त्या निमित्ताने धार्मिक अडसर येण्याचे काम करू नये, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार यांनी केले. ‘पहलगाम येथील आक्रमण म्हणजे धर्मविरोधी लढाई वाटते का ?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते बोलत होते.

संपादकीय भूमिका

  • धर्माची चर्चा आज नव्हे, तर गेल्या अनेक दशकांपासून निधर्मी भारतात चालूच आहे, हे शरद पवार यांना ठाऊक नाही का कि अशी विधाने करून ते जाणूनबुजून धर्माच्या सूत्राला बगल देऊ पहात आहेत ?
  • भगवा आतंकवाद ही संकल्पनेचा शरद पवार आणि त्यांच्या गटाने मोठ्या प्रमाणात दुष्प्रचार करून हिंदूंची हेटाळणी केली. त्या वेळी पवार यांनी असले प्रश्न का उपस्थित केले नाहीत ?
  • ‘आतंकवादाला धर्म नसतो; पण प्रत्येक आतंकवादी हा मुसलमान असतो’, हे अनेक घटनांतून वारंवार सिद्ध झालेले आहे, याविषयी शरद पवार का बोलत नाहीत ?