राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रती प्रेम असणारे अन् अध्यात्माची आवड असणारे सांगली येथील कै. नारायण रघुनाथ कुलकर्णी (वय ८२ वर्षे) !

आबांना धर्माविषयी पुष्कळ प्रेम होते. वर्ष १९९२ मध्ये बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी, तसेच त्या जागी श्रीराममंदिर उभारण्यासाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळी आबांची सरकारी नोकरी असूनही ते अयोध्येला गेले होते.

कठीण प्रसंगांतही स्थिर राहून परिस्थितीला धिराने सामोरे जाणार्‍या पुणे येथील कै. (श्रीमती) चन्नबसव्वा श्रीशैल परचंडे (वय ७२ वर्षे) ! 

वर्ष २००७ मध्ये आईला सर्दी झाली. तिची सर्दी डोक्यापर्यंत पोचली आणि ती बेशुद्ध झाली. तेव्हा तिला प्रचंड त्रास झाला. आई शुद्धीवर आल्यावर तिने सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज माझ्या शेजारी बसले होते. त्यांनी मला वाचवले.’’ 

कै. (श्रीमती) उषा ताम्हनकर यांच्या आजारपणात आणि त्यांच्या निधनाच्या वेळी त्यांची मुलगी सौ. स्नेहलता सखदेव यांना जाणवलेली सूत्रे

आईची सेवा करतांना ‘परमेश्वरानेच आपल्याला ही संधी दिली आहे’, असा भाव आम्हाला सर्वांना ठेवता आला.
आईची त्वचा हाताला मऊ लागत होती.

बेळगाव येथे रिक्शाचालक मुजाहिद जमादार याने केलेल्या मारहाणीनंतर गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा मृत्यू !

येथे रिक्शाचालक मुजाहिद शकील जमादार याने १५ फेब्रुवारीला केलेल्या मारहाणीनंतर गोव्यातील फोंडा येथील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे माजी आमदार आणि गोव्याचे माजी पोलीस उपअधीक्षक लवू मामलेदार (वय ६८ वर्षे) यांचे निधन झाले. 

मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. रामकृष्ण गोविंद गावडे (वय ८३ वर्षे) ! 

त्यांच्यामधील ‘सतत कार्यमग्न असणे, इतरांचा विचार करणे, निरपेक्षपणे वागणे आणि शेवटच्या क्षणापर्यंत नामाच्या अनुसंधानात असणे’, या गुणांमुळे मृत्यूसमयी त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचे निधन !

प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर (वय ८० वर्षे) यांचे यांचे १२ फेब्रुवारीच्या रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Acharya Satyendra Das Passed Away : अयोध्येतील श्रीराममंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे निधन

ते ८५ वर्षांचे होते. ‘स्ट्रोक’चा झटका आल्यामुळे ३ फेब्रुवारी या दिवशी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

ग्रामीण साहित्यिक रा.रं. बोराडे यांचे निधन

‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चे सदस्य ते अध्यक्ष, ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष, वर्ष १९८९ मध्ये हिंगोली येथे भरलेल्या ‘मराठवाडा साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद आदी अनेक पदे त्यांनी भूषवली होती.

Kameshwar Chaupal Passed Away : रामजन्मभूमी आंदोलनाचे पहिले कारसेवक कामेश्‍वर चौपाल यांचे निधन

आजारी असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार चालू होते.

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन !

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी (वय ७४ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने लीलावती रुग्णालयात उपचारांच्या काळात निधन झाले.