श्रद्धा वालकर हिच्या वडिलांनी घेतली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप !
प्रारंभीपासून वसईतील तुळींज पोलीस ठाणे आणि माणिकपूर पोलीस ठाणे येथील पोलिसांच्या असहकार्यामुळे मला पुष्कळ त्रास सहन करावा लागला. याविषयी अन्वेषण व्हावे. पोलिसांनी सहकार्य केले असते, तर माझी मुलगी जिवंत असती.