जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रगीताच्या वेळी उभे न रहाणार्‍या १४ जणांना अटक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथे २५ जून या दिवशी राज्याचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीतील एका कार्यक्रमात राष्ट्रगीत वाजवण्यात आले असता काही जण उभे राहिले नाहीत. अशांची चौकशी करून १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

तसेच राष्ट्रगीताच्या वेळी सर्वांनी उभे रहावे यासाठी सतर्क राहून प्रयत्न न करणार्‍या काही पोलिसांना निलंबितही करण्यात आले आहे.

(सौजन्य : editorji)

संपादकीय भूमिका 

जम्मू-काश्मीरमध्ये देशद्रोह्यांचा भरणा असल्यानेच तेथे अशा घटना घडत असतात ! काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी तेथील लोकांची जिहादी मानसिकता नष्ट करण्याची आवश्यकता आहे !