शासकीय जागेतील मशिदीचे अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करणार्‍यांवर कारवाई करा !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांच्यावर येऊ नये. सरकारी यंत्रणांनी स्वतःहून यावर कारवाई करणे आवश्यक !

ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठे धरण बांधून भारताचे पाणी पळवण्याचा चीनचा कुटील डाव !

भारताने चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखावी, यामध्ये तिबेटींवर चीनने केलेले अत्याचार जगासमोर मांडण्यासह चिनी वस्तूंवर भारतात बंदी लादण्यासारखे प्रयत्न प्राधान्याने करणे आवश्यक !

सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अवमान होऊ देणार नाही ! – केंद्र सरकार

ओटीटीवर दाखवल्या जाणार्‍या असभ्य आणि अपमानास्पद ‘वेब सिरीज’मधील मजकुरावर आळा घालण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत सर्वांना सूचित करण्यात आले.

अंतराळ यानाला परमाणू ऊर्जेवर चालवण्याच्या तंत्रज्ञानावर ‘इस्रो’चे काम चालू !

इस्रोने परमाणू ऊर्जेवर काम करण्यास आरंभ केला आहे. यासाठी ‘इस्रो’ आणि ‘बार्क’ या संस्था ‘रेडियो थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर’ला विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

गोव्यात अल्प धोका असलेले १४ धबधबे पर्यटकांसाठी आजपासूनच खुले  !

ज्यात धबधबे, चिरेखाणी आणि अन्य ठिकाणी मिळून मागील सुमारे दीड मासांत २० जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर एका धबधब्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने राज्यातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घातली होती.

बेंगळुरू (कर्नाटक) येथून ५ आतंकवाद्यांना अटक

सैयद सुहेल, उमर, जनिद, मुदासिर आणि जाहिद या सर्वांना कनकनगर येथील एका धार्मिक स्थळाजवळून मोठे षड्यंत्र रचत असतांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

रशियन सैनिक राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आदेशाचे पालन करत नाहीत !

रशियाच्या सैन्यातील बर्‍याच वरिष्ठ अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे. युद्धासाठी पुतिन यांच्या अवास्तव मागण्या, सैन्यातील अडथळे आणि रशियन संरक्षण मंत्रालयाची अकार्यक्षमता, याला कारणीभूत आहे.

सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

मुंबई येथील सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात कर्तव्यावर असणार्‍या सुरक्षारक्षकानेच वसतीगृहातील मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची घटना ६ जून या दिवशी उघडकीस आली होती.

जगभरातील हिंदूंनी पाकमधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवायला हवा ! – दानिश कनेरिया, पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू

पाकिस्तानी हिंदूंच्या व्यथेवर तर नाही; परंतु किमान भारतीय हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात तरी सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आदी आजी अथवा माजी क्रिकेटपटू कधीच काही बोलत नाहीत, हे जाणा !

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ म्हणणार नाही, आम्ही केवळ ‘अल्ला’पुढे मस्तक झुकवतो !’-अबू आझमी

‘वन्दे मातरम्’ हे कोट्यवधी देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ‘वन्दे मातरम्’ कोणत्याही एका धर्माचे नाही. ते धार्मिक गीत नाही. राज्यघटनेने ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आहे.