कोंढवा येथे शिक्षिकेचा विनयभंग करणार्‍या ३ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

कोंढव्यातील शाळेच्या मालमत्तेवरून दोन प्राचार्य आणि त्यांचा भाऊ जुबेर यांच्यात वाद चालू आहे. सकाळी शिक्षिका शाळेत जात असतांना जुबेर याने त्यांचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, तसेच इतरांनी ‘शाळेत जायचे नाही, नाहीतर आम्ही तुला मारणार’, अशी धमकी दिली.

समान नागरी कायद्याशी धर्माचा संबंध जोडणे योग्य नाही ! – मोनिका अरोरा, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय

प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि स्वाभिमानी जीवन जगण्याचे अधिकार घटनेने दिले असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्त्या मोनिका अरोरा यांनी व्यक्त केले. येथे संभाव्य ‘समान नागरी कायदा’ या विषयावर अधिवक्त्या मोनिका अरोरा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

संत चरित्र आणि विचारांची चुकीच्या पद्धतीने मांडणी करत भारतीय संस्कृतीला संकटात आणण्याचे प्रयत्न ! – धनंजय देसाई, हिंदु राष्ट्र सेना

संत चरित्र आणि संत विचारांची चुकीच्या पद्धतीने, लबाडीने मांडणी करत भारतीय संस्कृती, सभ्यतेला संकटात आणण्याचे प्रयत्न सध्या खेडोपाडी चालू आहेत. हे रोखण्यासाठी वारकरी कीर्तनकारांनी समाजात जाऊन वर्ग घेत स्वत:ची आध्यात्मिक भूमिका समाजासमोर मांडावी, असे आवाहन हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांनी वारकरी संप्रदायाला केले.

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘महाराष्ट्र परिचर्या परिषदे’चे विसर्जन !

मनुष्यबळ आणि वित्तीय साधने यांचा अपव्यय, तसेच अन्य शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यशासनाने ‘महाराष्ट्र परिचर्या परिषद’ तडकाफडकी विसर्जित केली आहे. नव्याने स्थापना होईपर्यंत या परिषदेवर ‘प्रशासक’ म्हणून जे.जे. रुग्णालयातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंत शिनगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

२२ लाख रुपये बुडण्याच्या धास्तीने लाडगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकर्‍याची आत्महत्या !

२०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या ‘आदर्श नागरी सहकारी पतसंस्थे’तील आपल्या कुटुंबियांची २२ लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने रामेश्वर इथर (वय ३८ वर्षे) या तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

माधवराव गाडगीळ महाशिवरात्र कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने १८ जुलै ते १४ ऑगस्ट ‘अधिक श्रावण मास संकल्प’ !

माधवराव गाडगीळ महाशिवरात्र कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने १८ जुलै ते १४ ऑगस्ट ‘अधिक श्रावण मास संकल्प’चे आयोजन करण्यात आले आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथे १ लाखाची लाच घेणार्‍या पोलीस अधिकार्‍याला अटक !

फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेणारे पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.

सातारा येथील स्नेहल मांढरे हिला ‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कार घोषित !

धनुर्विद्या खेळात उत्तुंग कामगिरी केल्याविषयी येथील स्नेहल विष्णु मांढरे हिला राज्यशासनाच्या वतीने वर्ष २०१९-२० या कालावधीतील ‘शिवछत्रपती’ हा राज्य क्रीडा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोर (जिल्हा पुणे) येथे त्यांना अभिवादन !

वीररत्न बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभु देशपांडे, वीर शिवा काशीद आणि बांदल सेनेच्या ३६३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पावनखिंड (कोल्हापूर) ते भोर तालुक्यातील कसबे शिंद गाव असे २५० कि.मी. ज्योत आणून हे अभिवादन केले.

१९ ते २२ जुलै या काळात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

हवामान विभागाने १७ जुलै या दिवशी रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला, तर १८ जुलै या दिवशी रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ दिला आहे. या काळात बहुतेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतीवृष्टीची शक्यता आहे.