लाखो भाविकांच्या उपस्थितीत देहू (पुणे) येथे ‘तुकाराम बीज’ सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

सकाळी १०.३० वाजता पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. दुपारी १२ वाजता ‘नांदुरकी वृक्षा’वर फुलांची उधळण करून मनोभावे हात जोडत वारकरी नतमस्तक झाले.

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांचा ‘षष्ठ्यब्दीपूर्ती’ सोहळा उत्साहात साजरा !

ज्येष्ठ मराठी उद्योजक आणि ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती (६० वा वाढदिवस) कार्यक्रम ३ मार्च या दिवशी येथे पार पडला.

भाजपचे खासदार मुनीस्वामी यांनी पती जिवंत असतांना टिकली न लावणार्‍या महिलेला खडसावले !

हिंदूंना धर्मपालन करण्यास कुणी सांगत असतांना त्याला काँग्रेस आणि अन्य ढोंगी पुरो(अधो)गामी विरोध करतात; मात्र हेच लोक कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाबवर बंदी आणण्याला विरोध करतात ! यातून त्यांचा ढोंगीपणा उघड होतो !

पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमोर उपस्थित केला हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचा विषय !

अशा बातम्यांमुळे भारतातील सर्व लोक चिंतित असणे आणि आम्ही व्यथित होणे स्वाभाविक आहे. या भावना आणि चिंता पंतप्रधान अल्बनीज यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

हनुमान मंदिराच्या परिसरातील दुकानात मटन पोचवण्यास नकार देणार्‍या कर्मचार्‍याला ‘स्विगी’ने नोकरीवरून काढले !

हनुमान मंदिराच्या व्यवस्थापनाकडून कर्मचार्‍याचा सत्कार

उद्योजक सदानंद कदम ‘ईडी’च्या कह्यात !

‘साई रिसॉर्ट’वर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने केलेली आहे. या कारवाईचा मी निषेध करतो. कोकणातील पर्यटन उद्ध्वस्त करण्याचे पाप हे सरकार करत आहे – माजी आमदार संजय कदम

‘एच्३एन्२ इन्फ्लूएंझा’मुळे २ जणांचा मृत्यू

देशात आतापर्यंत या तापाचे ९० रुग्ण आढळून आले आहेत. हरियाणा आणि कर्नाटक येथे हे मृत्यू झाले आहेत.

निवृत्त अग्नीवीर सैनिकांना सीमा सुरक्षा दलामध्ये १० टक्के आरक्षण मिळणार !

यापूर्वी केंद्रशासनाने आसाम रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांमध्येही अग्नीविरांसाठी आरक्षण घोषित केले आहे. 

(म्हणे) ‘उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला मुसलमान शासकाने भूमी दिली होती !’ – काँग्रेसचे नेते मिथुन राय

धादांत खोटी विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अशा नेत्यांना कारागृहात टाका !

चांगले किंवा वाईट आतंकवादी असा भेद करणे चुकीचे !

आतंकवादाच्या सर्व प्रकारांचा निषेध केला पाहिजे. आतंकवादाच्या कोणत्याही कृत्याचे समर्थन होऊच शकत नाही. पाकिस्तानकडे बोट दाखवत कंबोज म्हणाल्या की, आतंकवाद्यांना आश्रय देणारे देश ओळखले पाहिजेत. त्यांना त्यांच्या कृतीसाठी उत्तरदायी धरले पाहिजे.