देवद आश्रमातील साधक श्री. सुरेश सावंत यांना तुळजापूर येथे कुलदेवता श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी गेल्यावर आलेल्या अनुभूती

रांगेत १ घंटा उभे राहूनही ‘आम्ही देवीच्या चरणांपर्यंत कधी पोचलो’, हे माझ्या लक्षातच आले नाही. त्या वेळी मला स्वतःमधील चैतन्य पुष्कळ वाढल्याचे जाणवले.

सतत शिकण्याच्या स्थितीत असलेल्या जामनेर (जिल्हा जळगाव) येथील सौ. जयश्री पाटील (वय ४१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

साधकांना ऑनलाईन ‘गुरुमहिमा’ सत्संगाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ही घोषणा केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाविषयी नेकेलिस नोरोन्हा यांच्या विरोधात डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याच्या कारणावरून एक शिवप्रेमी नागरिक अभिजित नाईक यांनी नेकेलिस नोरोन्हा यांच्या विरोधात डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निवेदनामुळे कन्हैया कुमार याचे व्याख्यान रहित !

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ते रहित होण्यासाठी येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी करवीर पोलीस उपअधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

अमरावती येथील श्री अंबादेवीचे मंदिर रात्री साडेसात वाजेपर्यंतच खुले रहाणार !

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व दुकाने, मॉल, उपाहारगृह, बाजारपेठ आदी आस्थापने रात्री ८ वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.

हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये राज्य सरकारने महाशिवरात्रीला राजयोगी स्नानाऐवजी साधारण स्नान ठेवल्याने संन्यासी आखाडे संतप्त !

हिंदूंच्या धार्मिक कृतींमध्ये कुठल्याही पक्षाच्या सरकारने हस्तक्षेप न करता साधू, संत, महंत आणि शंकराचार्य यांना त्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे.

संतांना विश्‍वासात घेतल्याविना कुंभमेळ्याचा कालावधी निश्‍चित होऊ शकत नाही !

जर सरकार संतांसमवेत नसेल, तर संतही सरकारसमवेत नसतील, अशी चेतावणी परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी दिली आहे.

पँगाँग सरोवरापासून आपण मागे हटलो, तरी वेळ आल्यास तेथे ३ घंट्यांत  पुन्हा पोचू ! – माजी सैन्यदलप्रमुख व्ही.पी. मलिक

कैलाश रेंजवरून परत येण्याचा अर्थ, ‘आपण त्या ठिकाणी पुन्हा जाऊ शकत नाही’, असा मुळीच होत नाही.

भारत आणि चीन सैन्य पँगाँगमधून मागे फिरले; पण देपसांगचे काय ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा केंद्र सरकारला प्रश्‍न

चीन आणि भारत यांनी पँगाँग सरोवर परिसरातून पूर्णपणे सैन्य मागे घेतल्याचे काही माध्यमांनी घोषित करून टाकले आहे.

शासनाकडून पोलीस महासंचालकांना पत्र जाऊनही अद्याप कारवाई नाही !

श्री भवानीदेवीच्या मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या वतीने केलेल्या चौकशीचा अहवाल घोषित करावा, दोषींना कठोर शिक्षा करावी, जेणेकरून असा अपहार भविष्यात कुणी करण्याचे धैर्य करणार नाही.