तीव्र शारीरिक त्रास असूनही गुरूंप्रती असलेल्या अपार भावामुळे धानोरा (जिल्हा बीड) येथील श्री. महादेव गायकवाड (वय ८२ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

अखंड नामस्मरण करणारे आणि वारकरी संप्रदायानुसार साधना करणारे धानोरा येथील श्री. महादेव गायकवाड (वय ८२ वर्षे) यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. दीपाली मतकर यांनी दिली. २४ मार्च २०२५ या दिवशी धानोरा येथील गायकवाड वस्तीवर आयोजित एका अनौपचारिक सत्संगात पू. दीपाली मतकर यांनी श्री. गायकवाड यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये उलगडून त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची आनंदवार्ता दिली.

शांत, संयमी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाणारे सातारा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. प्रभाकर कदम (वय ८३ वर्षे)!

‘२४.२.२०२५ या दिवशी सातारा येथील प्रभाकर कदम यांचे निधन झाले. ८.३.२०२५ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

गोमंतभूमीतील ३ साधक जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त !

गोमंतभूमी (गोवा) असे परमपवित्र । येथे घडतसे श्री गुरूंचे अवतारी चरित्र ॥ येथीलच ३ जीव गुरुचरणी विसावले । साधकजन सारे आनंदसागरात न्‍हाले ॥

मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. रामकृष्ण गोविंद गावडे (वय ८३ वर्षे) ! 

त्यांच्यामधील ‘सतत कार्यमग्न असणे, इतरांचा विचार करणे, निरपेक्षपणे वागणे आणि शेवटच्या क्षणापर्यंत नामाच्या अनुसंधानात असणे’, या गुणांमुळे मृत्यूसमयी त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’

उतारवयातही तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे रानबांबुळी (तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. सुरेश दाभोळकर (वय ७१ वर्षे) !

‘श्री. सुरेश दाभोळकर यांनी २५.१०.२०२४ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे महत्त्व

ईश्‍वराची आध्‍यात्मिक पातळी जर १०० टक्‍के मानली आणि निर्जीव वस्‍तूंची ० टक्‍के मानली, तर सर्वसाधारण मनुष्‍याची आध्‍यात्मिक पातळी २० टक्‍के असते. या पातळीची व्‍यक्‍ती केवळ स्‍वतःच्‍या सुख-दुःखाचा विचार करते.

उडुपी येथील हितचिंतक श्रीमती सरोजिनी जे. उपाध्याय (वय ८२ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

७ व्या वर्षापासून वडिलांकडून शिकलेली मारुतीची उपासना करणार्‍या, तसेच समाज आणि कुटुंब यांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न करणार्‍या उडुपी जिल्ह्यातील सनातनच्या हितचिंतक श्रीमती सरोजिनी जे. उपाध्याय यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे

उड्डपी जिल्ह्यातील कोटेश्वर येथील श्रीमती लक्ष्मीदेवी पै (वय ८२ वर्षे ) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

श्रीमती लक्ष्मीदेवी पै यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले, ‘‘प्रत्येक प्रसंगात भगवंत आमच्याकडून सर्वकाही करवून घेतो, अशी ठाम श्रद्धा असेल, तर सर्व काही शक्य आहे.’’

म्‍हातारपणी आध्‍यात्मिक पातळी ६० किंवा ७० टक्‍के होण्‍याचा लाभ !

आयुष्‍याची अधिक वर्षे शेष राहिली नसल्‍यामुळे अधिक आध्‍यात्मिक पातळी वाढण्‍याचा संभव पुष्‍कळ न्‍यून होतो; परंतु त्‍याचा एक लाभ, म्‍हणजे आध्‍यात्मिक पातळी घसरण्‍याचा संभवही पुष्‍कळ न्‍यून होतो.

वाराणसी आश्रमातील सौ. प्राची जुवेकर (वय ६१ वर्षे) ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त !

वाराणसी आश्रमातील साधिका सौ. प्राची हेमंत जुवेकर या ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त झाल्‍या आहेत, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केली.