भीमा नदीपात्रात सापडली भगवान शंकराची पुरातन मूर्ती

भीमा नदीपात्रातील २८ मोर्‍यांच्या रेल्वे पुलाजवळ भगवान शंकराचे मुख असलेली अनुमाने १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकाम करतांना सापडली आहे. या मूर्तीचा तोंडवळा ५ फूट असून तिचे वजन १ टनापर्यंत आहे.

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा आरोप

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती !

अकोले (जिल्हा नगर) येथील आदिवासींच्या धर्मांतराचा प्रयत्न आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उधळला !

आदिवासींचे धर्मांतर रोखणार्‍या आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या धूर्त ख्रिस्त्यांवर कारवाई होईपर्यंत हिंदूंनी सरकारचा पाठपुरावा करावा ! सरकारनेही राष्ट्रीय पातळीवर कठोर कायदा केला पाहिजे !

भाजपच्या आमदाराने पूजेच्या ठिकाणी असलेली पूजा सामग्री लाथेने उडवली !

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे हुतात्मा स्मारकाच्या भूमीपूजनाचे निमंत्रण न दिल्याने आमदाराची कृती ! भाजपच्या आमदारांकडून असे घडणे अपेक्षित नसून अशा प्रकारांमुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, हे निश्‍चित !

पाकमध्ये गेल्या ६ वर्षांत बलात्काराच्या २२ सहस्र घटना; मात्र शिक्षा केवळ ७७ जणांनाच !

पाक इस्लामी देश असतांनाही तेथे अशांना शरीयतनुसार शिक्षा देत नाहीत, हे लक्षात घ्या ! केवळ सोयीपुरती शरीयतची मागणी केली जाते. यातून धर्मांधांचे ढोंगी धर्मप्रेम उघड होते !

बलुचिस्तानमध्ये बलुचींनी केलेल्या आक्रमणात पाकचे ७ सैनिक ठार 

पाकच्या बलुचिस्तानमधील बलुच लोकांच्या एका संघटनेने पाक सैन्याच्या चौकीवर आक्रमण करून ७ सैनिकांना ठार केले. या घटनेसाठी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला उत्तरदायी ठरवले आहे.

चिनी प्रवाशांना भारतात आणू नये ! – भारत सरकारचा विमान आस्थापनांना आदेश

भारताने हे योग्यच केले; मात्र त्यासह चीनने नोव्हेंबर मासात जर असा निर्णय घेतला होता, तर भारताने तात्काळ असा निर्णय घेणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित होते ! आता भारतीय प्रवाशांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

राजकीय भडास काढण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा वापर ! – खासदार संजय राऊत, शिवसेना नेते

‘‘कुटुंबियांना लक्ष्य करणे, ही नामर्दानगी आहे. या नामर्दानगीला शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल. बायकांच्या पदाराआडची खेळी तुमच्यावर उलटल्याविना रहाणार नाही. आमच्यापैकी कुणी काहीही चुकीचे केलेले नाही.

नागरिकांना नववर्षांचे स्वागत करायला द्यावे, यासाठी मनसेकडून मुख्यमंत्र्यांना विनंती !

‘वर्षभर आम्ही तुमचे ऐकले, आता १ दिवस आमचे ऐका. नागरिकांना ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करू द्या’, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाराचा राजकारणासाठी उपयोग महाराष्ट्रात पाहिलेला नाही ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

भाजपच्या विरोधात बोलणार्‍यांच्या मागे अंमलबजावणी संचालनालयाची चौकशी लावली जाते.=अनिल देशमुख