अचलपूर येथे धर्मांधांकडून पुतण्या आणि काका यांना मारहाण !

प्रतिकात्मक चित्र

अचलपूर  – शहरातील ‘गांधीपूल परिसरात बॅनर का फाडले ?’, अशी विचारणा करत एका १७ वर्षीय मुलाला लाथा बुक्क्यांनी धर्मांधांनी मारहाण केली. त्यानंतर मुलाचे काका पंकज केचे यांनाही लाथा बुक्क्यांनी ८ ते १० धर्मांधांनी मारहाण केली. १७ सप्टेंबरला रात्री विलंबाने ही घटना घडली.

मुलाला पोलीस ठाण्यात नेत असतांना धर्मांधांनी पोलीस आणि जमाव यांच्यावर दगडफेक केली. यात २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. या घटनेनंतर अचलपुरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे.

१७ वर्षीय मुलगा त्याच्या मित्रासमवेत गांधी पुलावरून घरी जात असतांना त्याला ८ ते १० धर्मांधांनी रोखून वाद उकरून काढून त्याचा भ्रमणभाष आणि दीड सहस्र रुपये हिसकावून घेतले. केचे यांच्या पायावर आणि पाठीवर मार लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहीत खान, अप्पू, बज्जू, हमीद ड्रायव्हर, जावेद, अन्वर, बाबा, अजीज, उस्मान बेग, हफीज खान यांच्यासह ८ ते १० जणांच्या विरोधात  पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत.

अद्याप आरोपींना अटक नाही

सध्या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. (गावातील आरोपी सर्वांना ठाऊक असतांना त्यांचा शोध न लागणे हे संशयास्पद आहे ! – संपादक)

पीडित मुलगा हा तक्रार नोंदवण्यासाठी जात असतांना धर्मांधांनी परत पोलिसांवर  दगडफेक चालू केली. यात एका महिला पोलीस कर्मचार्‍यासह २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले. या प्रकरणी समरसपुरा पोलिसांनी २० ते २५ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

दगडफेकीची घटना घडल्यानंतर हिंदूंनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पहाटेपर्यंत अचलपुरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचे प्रयत्न केले.

संपादकीय भूमिका :

  • कायद्याचे यत्किंचितही भय नसलेले धर्मांध
  • काही ना काही निमित्त शोधून हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर वचक रहाण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटनच आवश्यक !