(म्हणे) ‘केंद्र सरकार मुसलमानांवर घाव घालत आहे !’ – मौलाना अरशद मदनी
प्रत्येक नागरिकाला न्याय्य अधिकार देणारा समान नागरी कायदा न करून गेली ७५ वर्षे हिंदूंवर घालण्यात आलेल्या घावांविषयी मदनी का बोलत नाहीत ?
प्रत्येक नागरिकाला न्याय्य अधिकार देणारा समान नागरी कायदा न करून गेली ७५ वर्षे हिंदूंवर घालण्यात आलेल्या घावांविषयी मदनी का बोलत नाहीत ?
गोवा मुक्तीच्या ६० वर्षांत क्रांतीलढ्याचा इतिहास, कुंकळ्ळीवासियांचा लढा, इन्क्विझिशनचा भयानक इतिहास पाठ्यपुस्तकात अंतर्भूत न होणे दुर्दैवी ! स्वातंत्र्यसेनानी टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्हास’ झाल्याचे म्हटले, ते योग्यच होते !
मजारीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर एका वृत्तवाहिनाच्या प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले की, या भेटीमुळे शिवसेनेची कोंडी होणार नाही. औरंगजेब ५० वर्षे राज्य करून गेला. ते तुम्ही पुसणार आहात का ?
सौ. अमृता फडणवीस यांना ‘ब्लॅकमेल’ करणार्या अनिल जयसिंघानी याची अनुमाने ३.४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ‘ईडी’ने पी.एम्.एल्. प्रकरणी ही कारवाई केली आहे.
‘१८.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वक्त्यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी देवाने आमच्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
पणजी येथे १४ जून या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी गोव्यातील हिंदूंना भेडसावणार्या विषयाचे जिज्ञासूपणे प्रश्न विचारून त्यावर हिंदु जनजागृती समितीची भूमिका जाणून घेतली.
प्रतिदिन १२५ ते १३५ रुग्णांना रुग्णालयांमध्ये भरती केले जात आहे. १५ जून या एकाच दिवशी १५४ रुग्णांना भरती केल्यानंतर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. १६ जूनला २०, तर १७ जूनला ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या गोरक्षकांनी १६ जून या दिवशी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले. गोरक्षकांनी भाग्यनगर रस्ता येथे थांबून पोलिसांच्या साहाय्याने गोवंशीय असलेले वाहन पकडले.
श्रद्धा वालकरच्या प्रकरणानंतरही अनेक ठिकाणी हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चाद्वारे हिंदूंनी याविरोधात रोष व्यक्त करूनही अशा घटना थांबवण्यास सिद्ध नाहीत. धर्माचरण आणि साधना हेच समस्येसाठी मूळ उत्तर असल्याने ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी युवतींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
कोट्यवधींची उलाढाल असलेला आणि मराठी तरुणांना रोजगार देणारा श्री गणेशमूर्तींच्या कारखान्यांचा उद्योग बंद करून मराठी माणसाचा रोजगार बुडवू नका. यावर्षीही ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (‘पीओपी’च्या) श्री गणेशमूर्तींना अनुमती मिळायलाच हवी. मुंबई महापालिकेने घातलेली बंदी आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अधिवक्ता आशिष शेलार यांनी मांडली.