वर्ष १८५७ पासून १९४७ पर्यंत चालू राहिलेला क्रांतीयज्ञ !
२२.६.१८९७ या दिवशी लोकमान्य टिळक यांचे अनुयायी असलेल्या कीर्तनकार क्रांतीकारक चापेकर बंधूंनी पुण्यातील गणेशखिंडीच्या रस्त्यावर ‘रॅन्ड’ आणि ‘आयर्स्ट’ या दोन इंग्रज अधिकार्यांना गोळ्या घालून ठार मारले.
देशप्रेमाचे स्फुलिंग चेतवणारे ‘वन्दे मातरम्’ !
वर्ष १८७६ मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी संस्कृतप्रचुर बंगाली भाषेत ‘वन्दे मातरम्’ हे गीत रचले. पुढे वर्ष १८८२ मध्ये त्यांनीच लिहिलेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत या गीताला स्थान मिळाले. त्यानंतर ते अधिकच प्रसिद्धीस आले.
ब्रिटीश राजवटीत जप्त केलेली हनुमानाची मूर्ती अजूनही पुणे पोलिसांच्याच कह्यात !
क्रांतीकारकांच्या श्रद्धास्थानाचे संवर्धन करण्याऐवजी त्यांना ‘मुद्देमाल’ समजणे संतापजनक आहे. या मूर्तीची कायदेशीर प्रक्रियेतून मुक्तता करून तिची एखाद्या भव्य मंदिरात सार्वजनिक दर्शनासाठी स्थापना का केली जात नाही ?
Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak : कोलू फिरवण्याच्या प्रात्यक्षिकांद्वारे अंदमानात क्रांतीकारकांनी भोगलेल्या अत्याचारांची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न !
क्रांतीकारकांनी भोगलेल्या या अनन्वित अत्याचारांची जाणीव आताच्या पिढीमध्ये निर्माण व्हावी, यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’च्या वतीने ४ आणि ५ एप्रिल या दिवशी कोलू फिरवण्याचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते.
Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak : दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात कोलू फिरवण्याची संधी !
उपक्रमात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र त्याच दिवशी देण्यात येईल. कोलू फिरवून निघालेले तेलही उपक्रमाच्या २ दिवसांनी सर्वांना देण्यात येईल. स्वातंत्र्याचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी या उपक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
देवनागरी लिपीचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंह !
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंह या दोघांचेही भाषिक विचार बघितले की, हे लक्षात येते की, या दोन्ही महान विचारवंतांना परकीय भाषांविषयी आकस अथवा तिरस्कार नव्हता.
कामथे (ता. चिपळूण) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांतीगाथा प्रदर्शन !
‘विद्यार्थी, तसेच युवकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती राष्ट्रधर्माचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे हे क्रांतीकारकांचे प्रदर्शन आहे. क्रांतीगाथा प्रदर्शनातून विद्यार्थी, तसेच तरुण पिढीमध्ये देशभक्ती निश्चित निर्माण होईल.’