महाभारताच्या युद्धासाठी १८ दिवस लागले, कोरोनाचे युद्ध जिंकायला २१ दिवस लागतील ! – नरेंद्र मोदी

महाभारताचे युद्ध जिंकायला १८ दिवस लागले होते. आज कोरोनाचे युद्ध जिंकायला आपल्याला २१ दिवस लागणार आहेत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या काशी मतदारसंघातील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधतांना केले.

अयोध्येत तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात रामललाची स्थापना

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अयोध्येतील रामजन्मभूमीवर तब्बल २७ वर्षे एका तंबूमध्ये असणार्‍या रामललाला येथून जवळच एका तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात विधीवत् स्थापित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात येथे विधीवत पूजा करून चांदीच्या सिंहासनावर रामललाची स्थापना केली.

‘लॉकडाऊन’चे पालन न करणार्‍यांच्या विरोधात उत्तरप्रदेश पोलिसांकडून सामाजिकदृष्ट्या लाज वाटेल अशी कारवाई

देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दळणवळणबंदी घोषित करण्यात आली आहे. असे असतांना अनेक नागरिक शासनाने दिलेल्या सूचना धुडकावून लावत रस्त्यावर फिरत आहेत. यावर उत्तरप्रदेश पोलिसांकडून ‘लॉकडाऊन’चे पालन न करणार्‍यांच्या विरोधात सामाजिकदृष्ट्या लाज वाटेल

उत्तरप्रदेशमध्ये विदेशी पर्यटक रस्त्यावर फिरतांना आढळल्यास त्यांचे पारपत्र घेतले जाणार कह्यात !

येथे राज्य सरकारने दळणवळणबंदी घोषित केलेली असतांना काही विदेशी नागरिकांकडून या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कौशल किशोर शर्मा यांनी विदेशी पर्यटकांसाठी एक कठोर निर्णय लागू केला आहे.