दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कुवेतहून भारतात आलेल्या ३ आरोपींना जामीन !; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद !…

कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने जामीन संमत केला. आरोपीविरोधात संशयास्पद पुरावे किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही.

आपल्या रक्तामध्ये जातीपातीचे राजकारण भिनले आहे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

महापुरुष आपल्या रक्तात भिनण्याऐवजी जातीपातीचे राजकारण आपल्यामध्ये भिनले आहे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

पंतप्रधानांना गुजरात राज्याविषयी प्रेम असेल, तर आपल्याला मराठी भाषेविषयी प्रेम का नाही ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’चा पहिला पुतळा हा गुजरात येथे बांधण्यात आला. ‘ड्रीम सिटी प्रोजेक्ट’ आणि हिर्‍यांचा व्यापारही गुजरात राज्यात न्यावासा वाटतो.

अमेरिकेत मराठी शाळा चालू; पण महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होणे खेदजनक ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

शिक्षण विभागाला याविषयी काय म्हणायचे आहे ?

तुमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या, आता आरक्षण केव्हा मिळणार ? हे मुख्यमंत्र्यांना विचारा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २७ जानेवारी या दिवशी ‘एक्स’वर पोस्ट करत मराठा आरक्षणासाठी लढा देणार्‍या मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करून आपले मत व्यक्त केले आहे. 

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड !

या संदर्भात राजन साळवी यांनी म्हटले आहे की, अधिकार्‍यांना संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. मला अटक झाली तरी चालेल. अटक, कारागृह हे काही मला नवीन नाही. मी काय आहे, ते माझे कुटुंब, जनता यांना ठाऊक आहे.

अमित ठाकरे यांच्याकडून मला जिवे मारण्याचा प्रयत्न ! – महेश जाधव, माथाडी नेते यांचा आरोप

२० वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्याला तुम्ही अशा पद्धतीने वागवता. केवळ पैशासाठी काम करणारी ही संघटना आहे, असा आरोप मनसेचे माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी केला आहे.

मराठा-ओबीसी हा वाद कुणीतरी घडवत असून आपण गाफील आहोत ! – राज ठाकरे, मनसे

महाराष्ट्र एकसंघ राहू नये; म्हणून सगळे प्रयत्न करत आहेत. आम्ही गाफील आहोत. ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांतिका आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात मराठी माणसाच्या भूमी काढून घेतल्या जात आहेत ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

रायगडमध्ये विमानतळ येत आहे. यानंतर इथे बाहेरच्या राज्यातील लोकांना जागा विकल्या जातील. भूमी काढून घेणे ही महाराष्ट्राविरोधातील सहकार चळवळ आहे. आम्ही मात्र जातीजातीमध्ये भांडत आहोत.

Raj Thackeray : राज ठाकरे यांना श्रीराममंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले नाही, तरी त्यांनी यावे !  

हनुमान गढीचे महंत राजू दास यांचे आवाहन !