स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध अपमानकारक टीका अस्वीकारार्ह !

भारत अखंड सार्वभौमत्व असलेला देश आहे. आपण भारतीय लोक प्राचीन राष्ट्र आहोत. भारत हा खंडांनी मिळून बनलेला नाही; पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भारत कदाचित् तोडकामोडका दिसत असेल; म्हणून त्यांनी ‘भारत जोडो’ पदयात्रा काढली.

चित्रपट दिग्‍दर्शक राजकुमार संतोषी यांची मुंबई पोलिसांकडे अतिरिक्‍त सुरक्षेची मागणी !

संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे : एक युद्ध’ २६ जानेवारी या दिवशी प्रसारित होणार आहे. या चित्रपटाचे प्रसारण रहित करा, अन्‍यथा परिणाम वाईट होईल, अशी धमकी मिळाल्‍याचे राजकुमार संतोषी यांनी पत्रात म्‍हटले आहे.

धर्माधिष्ठित बंगालवरील सांस्कृतिक आक्रमणे आणि पुनरुत्थान !

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. त्यातील बंगालमधील मासिक ‘ट्रूथ’चे संपादक आणि शास्त्र-धर्म प्रचार सभेचे उपसचिव पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांचे मार्गदर्शन येथे देत आहोत.

(म्हणे) ‘गांधींजींच्या हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली !’

गांधीहत्येच्या खटल्यात न्यायालयाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तरीही असे विधान करून तुषार गांधी हे न्यायालयाचा आणि पर्यायाने राज्यघटनेचा अवमानच करत आहेत ! अशांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे !

भारतीय चलनावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र प्रसिद्ध करा !

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून याविषयी कृती करणे आवश्यक !

मोहनदास गांधी यांच्या हत्येवर ‘बुलेट’ नावाचा चित्रपट येणार !

म. गांधी यांच्यावर ३ गोळ्या झाडण्यात आल्याचे म्हटले जाते. प्रत्यक्षात त्यांच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या. ही चौथी गोळी पंडित नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून सुटलीच नव्हती.

कोलकाता येथील दुर्गापूजा मंडपात म. गांधी यांना दाखवले राक्षसाच्या रूपात

या पुतळ्याचे आणि म. गांधी यांच्यामधील साम्य योगायोग असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी स्वातंत्र्य चळवळीतील गांधी यांच्या भूमिकेवर टीका करणे आवश्यक असल्याचेही आयोजकांनी म्हटले आहे.

धार्मिक भावनांचे दुटप्पी राजकारण आणि त्याचे परिणाम !

एरव्ही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्यावर हिंदूंकडून संबंधितांवर कारवाई करण्याची न्याय्य मागणी झाली, तर ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या गोंडस नावाखाली हिंदूंनाच उपदेशाचे डोस पाजले जातात; परंतु सध्या ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) या हिंदुविघातक मोहिमेच्या विरोधात पुरो(अधो)गामी टोळीतील एकही महाभाग चकार शब्दही काढायला सिद्ध नाही. नेमक्या याच हिंदुद्रोही दुटप्पीपणावर प्रकाश टाकणारा हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

म. गांधी यांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या प्रकरणी काँग्रेसच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक !

स्वतःच्या कार्यकर्त्यांवर गांधी यांच्या अहिंसावादी विचारांचा संस्कार करू न शकणारी काँग्रेस म्हणे देशाला आणि जगाला अहिंसा शिकवण्याचा प्रयत्न करते !

न्यूयॉर्कमध्ये हिंदु मंदिराच्या आवारातील म. गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड

साऊथ रिचमंड हिल येथील क्वीन्स काऊंटीमधील श्री तुलसी मंदिर परिसरात १८ ऑगस्टच्या मध्यरात्री म. गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी तोडफोड केली.