
पंढरपूर – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात मंदिरात भ्रमणभाष, तसेच ‘कॅमेरा’सदृश्यप्रवेश बंदीची तंतोतंत कार्यवाही करण्यात येत आहे. सर्व कर्मचार्यांना ओळखपत्र परिधान करण्याच्या, तसेच कर्मचार्यांनी मंदिरात प्रवेश करणे आणि बाहेर पडण्यासाठी केवळ ‘अतीमहनीय द्वारा’चा (व्ही.आय.पी. गेट) वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.