स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गांधी यांचा अवमान : भारतात कायद्याची समानता आहे का ?

म. गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराज यांना अटक केली. परंतु क्रांतीकारक सावरकर यांच्याविषयी अनेकदा आक्षेपार्ह विधाने करण्यात आली; परंतु विधाने करणार्‍यांच्या विरोधात कधीच कारवाई झालेली नाही.

कालीचरण महाराजांना एक दिवसाची पोलीस कोठडी !

महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी रायपूर तुरुंगातून कह्यात घेतले असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कालीचरण महाराजांच्या समर्थनार्थ पाथर्डी तालुक्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची फेरी !

महात्मा गांधी यांच्याविषयी कथित वादग्रस्त विधान केल्याने अटकेत असलेल्या कालीचरण महाराजांच्या समर्थनार्थ पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मोटारसायकलची फेरी काढली.

‘म. गांधी यांनी देशाचे तुकडे केल्याने ते ‘महात्मा’ नाहीत आणि ‘राष्ट्रपिता’ही होऊ शकत नाहीत’, असे म्हणणारे तरुण मुरारी बापू यांच्यावर गुन्हा नोंद !

तरुण मुरारी बापू अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. तरुण मुरारी बापू यांनी छिंदवाडा रोडवरील वीरा लॉन येथे श्रीमद् भागवत कथेच्या वेळी वरील विधान केले होते.

कालीचरण महाराज यांची २४ घंट्यांत सुटका केली नाही, तर हिंदु महासभा आंदोलन करणार ! 

म. गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या कालीचरण महाराज यांना पुढील २४ घंट्यांत सोडण्यात आले नाही, तर हिंदु महासभा रस्त्यावर उतरून आंदोेलन करील, अशी चेतावणी  हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी त्रिदंडी महाराज यांनी दिली आहे.

कालीचरण महाराजांना खजुराहो (मध्यप्रदेश) येथून छत्तीसगड पोलिसांकडून अटक !

काँग्रेस सरकारच्या पोलिसांची इतकी तत्परता आणि कृतीशीलताराज्यातील नक्षलवादी, हिंदूंचे धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी, गोहत्या करणारे आदींच्या विरोधात का नसते ?

म. गांधी यांच्याविरोधात अपशब्द बोलण्याविषयी मला पश्‍चाताप नाही ! – कालीचरण महाराज

म. गांधी यांना अपशब्द बोलल्याच्या प्रकरणी माझ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याविषयी मला कोणताही पश्‍चाताप नाही. माझ्या मनात गांधी यांच्याविषयी तिरस्कार आहे. मी पंडित नथुराम गोडसे यांना कोटी कोटी नमस्कार करतो.

गांधी जयंतीच्या दिवशी ‘गोडसे झिंदाबाद’ बोलणार्‍याला फाशी दिली पाहिजे ! – भाजपचे खासदार वरुण गांधी

भारताच्या फाळणीला, तसेच राष्ट्राविषयीच्या आणि हिंदूंविषयीच्या अन्य अनेक घोडचुकांना उत्तरदायी असणार्‍या म. गांधी यांच्याविषयी लोकांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे !

‘लोकमान्य’रूपी ठेवा !

महापुरुषांना जातीयवादातून पहाणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या राष्ट्रकार्याचा अपमानच आहे. राजकारण बाजूला ठेवून ज्या वेळी हे राष्ट्रकार्य भावी पिढीसमोर ठेवले जाईल, त्याच वेळी खर्‍या अर्थाने भारत बलशाली होईल !

क्रांतीकारकांचा अपमान करणारी काँग्रेस !

स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्यांच्या अवमानाविषयी बोलणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहासात डोकावून पाहिले, तर काँग्रेसने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा किती वेळा अपमान केला, याची गणतीही करता येणार नाही.