मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – पहलगाम आतंकवादी आक्रमणाविषयी केवळ देशातच नाही, तर जगभरातील भारतियांमध्ये संताप आहे. पहलगाम आक्रमणाचा निषेध करण्यासाठी मेलबर्न, लंडन, काठमांडू यांसह अनेक ठिकाणी भारतीय समुदाय रस्त्यावर उतरला आहे. २६ एप्रिल या दिवशी मेलबर्नमध्ये सहस्रो भारतियांनी पाकपुरस्कृत आतंकवादाच्या विरोधात निदर्शने केली.
निदर्शकांनी हातात फलक धरले होते. त्यांनी ‘पाकिस्तान आतंकवाद थांबवा’, ‘पाकिस्तान आर्मी ही आतंकवादी आर्मी’ आणि ‘हिंदूंचे जीवन महत्त्वाचे आहे’ अशा घोषणा दिल्या. काठमांडूमध्येही लोकांनी पाकिस्तान दूतावासाजवळ निदर्शने केली.