गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईविषयी आवाज उठवीन ! – सुभाष देशमुख, आमदार, भाजप

गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून आवाज उठवीन, असे आश्‍वासन भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी अ. भा. कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना दिले.

श्री साईबाबा संस्थान मंदिर प्रवेशाची नियमावली जाचक असल्याविषयी उच्च न्यायालयात याचिका

श्री साईबाबा मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंदिर परिसरातील प्रवेशाविषयी नवीन नियमावलीची कार्यवाही चालू केली आहे. या अटी जाचक असल्याचा दावा करत पत्रकार माधव ओझा यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वैदिक, वैष्णव, शाक्त किंवा शैव परंपरेतील सन्माननीय व्यक्तीची नियुक्ती करावी ! – साधू-महंतांची राज्यपालांकडे मागणी

सांस्कृतिक मंत्रालय मंत्री तथा राज्यमंत्री किंवा राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वैदिक, वैष्णव, शाक्त किंवा शैव परंपरेतील सन्माननीय व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी साधू-महंतांनी राज्यपालांकडे केली आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी बंजारा समाजाचे मुख्यमत्र्यांना निवेदन  

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांची विरोधक सातत्याने करत असलेली अपकीर्ती थांबबावी, यासाठी बंजारा समाजाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहस्रो स्वाक्षर्‍यांचे निवेदन दिले.

उत्पादनांच्या वेष्टनावरील हनुमानाचे चित्र न हटवल्यास आंदोलन करणे भाग पडेल ! – न्याय निवाडा लोकनेता फाऊंडेशनच्या वतीने श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेला निवेदन

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेच्या विविध उत्पादनांवर श्री हनुमानाचे चित्र मुद्रित करण्यात आले आहे. या उत्पादनांची वेष्टने यांचा वापर करून झाल्यावर ती रस्ता, कचरा, तसेच अन्यत्र टाकून दिली जातात..

ठाणे येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

देहली शहरातील हिंदुत्वनिष्ठ रिंकू शर्मा यांची क्रूरपणे हत्या करणाार्‍या जिहादी आक्रमणकर्त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे निवेदन १७ फेब्रुवारी या दिवशी ठाणे येथील नायब तहसीलदार श्री. प्रदीप पळसुले यांना देण्यात आले.

एल्.ई.डी. बल्ब प्रकल्प निधी वाढवून द्या ! – शिवसेनेचे निवेदन

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात येणार्‍या प्रस्तावित एल्.ई.डी. बल्ब प्रकल्पात पालट करून २५ कोटी रुपयांचा निधी वाढवून द्या, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले.

रिंकू शर्मा यांची हत्या करणार्‍या जिहादी आक्रमणकर्त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या !

जिहाद्यांनी रिंकू शर्माची क्रूर हत्या केली. पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे हा भयानक प्रकार घडला आहे.

कह्यात घेतलेल्या धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे निवेदन !

शरजील उस्मानीचे वक्तव्य प्रकरण आणि देहली येथील हिंदुत्ववादी रिंकू शर्मा हत्या प्रकरण !

‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करण्याविषयी पुणे आणि हिंगणघाट येथे निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पाश्‍चात्त्य विकृतीला आळा बसावा आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस प्रशासन तसेच शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली.