पुणे येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रण !

पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यानिमित्ताने गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत होणार्‍या भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण पुणे येथे विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या मान्यवरांना देण्यात येत आहे. या अंतर्गत भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णीं, विश्व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख श्री. दादा वेदक, प्रसिद्ध बासरीवादक आणि महामहोपाध्याय पंडित पू. डॉ. केशव गिंडे, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित विकास कशाळकर यांना शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले.

खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांचे सनातन संस्थेविषयीचे मनोगत आणि समाजाला केलेले आवाहन !

भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णीं यांना शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण देऊन त्या करत असलेल्या कार्यासाठी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तसेच त्यांना सनातन संस्थेच्या २५ वर्षांतील कार्याविषयीची माहिती दिली. सनातन संस्थेचे कार्य ऐकल्यावर प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णीं म्हणाल्या की, सनातन संस्थेचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना या महोत्सवासाठी शुभेच्छा देते. ‘संघटन में शक्ती है ।’, या शक्तीचा आपण उपयोग करूया आणि आपले राष्ट्र पुन्हा एकदा मूळ सनातन विचारधारेवर आणण्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येण्याची आवश्यकता आहे. हे महान कार्य सनातन संस्थेच्या वतीने होत आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. विकास कशाळकर यांना निमंत्रण देतांना श्री. चैतन्य तागडे प्रसिद्ध बासरीवादक, महामहोपाध्याय, पं.पू. डॉ. केशव गिंडे यांना निमंत्रण देतांना डॉ. ज्योती काळे
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. संजय गरुड यांना निमंत्रण देतांना डॉ. ज्योती काळे विश्व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख श्री. दादा वेदक यांना निमंत्रण देतांना (डावीकडे) श्री. कृष्णाजी पाटील, श्री. बाळकृष्ण घोरपडे

या कार्यासाठी सर्वांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक, सामाजिक, राजकीय पाठबळ आवश्यक आहे. अध्यात्म, राजकीय क्षेत्र, तसेच आपापल्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी उत्तुंग असे कार्य केलेले आहे, अशी अनेक मान्यवर मंडळी येथे येणार आहेत. आपल्या सगळ्यांशी चर्चा, विचारविनिमय करणार आहेत. यासाठी आपण सर्व हिंदु बांधवांनी या महोत्सवाला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग देऊया.’’