पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांचा ‘सूत्रधार’ शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करा !

पू. भिडेगुरुजी यांना लवकरात लवकर सुरक्षा पुरवण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.

कोल्हापूर महानगरपालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला १ सहस्र २६१ कोटी रुपये जमेचा अर्थसंकल्प सादर !

वर्ष २०२४-२५ चा नवीन अर्थसंकल्प महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ५ मार्चला घोषित केला. नागरिकांकडून थेट सूचना मागवून त्याचा अंतर्भाव केलेला, कोणतीही करवाढ नसलेला १ सहस्र २६१ कोटी रुपये जमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

आंतरराज्य आणि आंतरजिल्हा सीमाभागातील तपासणी चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय !

येत्या २ महिन्यांत होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बेळगाव प्रशासनाने आंतरराज्य अन् आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय समन्वयक बैठकीत घेतला आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिल्याविषयी सकल मराठा समाजाकडून शासनाचे अभिनंदन !

मराठा समाजाच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ हॉल या ठिकाणी मराठा आरक्षण याविषयी चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली होती.

इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेसाठीच्या तज्ञ समितीचा अहवाल १ मासात द्यावा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजना चालू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून १ मासात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचा पहाणी अहवाल सादर करण्याविषयी पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकार्‍यांना न्यायालयाचा आदेश !

मूर्तीची स्थिती गंभीर असून त्यासाठी आता पहाणी होऊन जो अहवाल येईल, तो मूर्तीची सत्यस्थिती सांगणारा असावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी पत्रकारांशी बोलतांना केली आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानाच्या अध्यक्षपदी वैभव काळू पुजारी यांची निवड !

नूतन अध्यक्ष श्री. वैभव काळू पुजारी म्हणाले, ‘‘दत्त देव संस्थानाच्या माध्यमातून यात्रेकरू आणि भाविक यांना विविध, तसेच आधुनिक सेवा-सुविधा पुरवून विकासासाठी प्रयत्न करू.

इचलकरंजीतील पंचगंगेचे प्रदूषण करणारे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करावे यासाठी २६ फेब्रुवारीला ‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चा !

इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनाकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच रक्त आणि मांसमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते. 

दीड सहस्रांहून अधिक नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपचे उपाध्यक्ष शैलेश पाटील यांच्या पुढाकारातून २० आणि २१ फेब्रुवारीला शाहूपुरी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कोल्हापूर येथे २४ ते २६ फेब्रुवारी ५ वे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर साहित्य संमेलन ! – मनोहर सोरप, जिल्हाध्यक्ष, हिंदु महासभा

२४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.३० वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाचा प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता पहिले सत्र प्रारंभ होईल. दुपारच्या सत्रात ‘हिंदु मावळा’ आणि ‘हिंदु भूषण’ पुरस्कार वितरण करण्यात येईल