गोवा : अबकारी खात्यात घोटाळा करणार्‍या वरिष्ठ कारकुनाने ११ लाख रुपये परत केले

पैसे परत केले, तरी या घोटाळ्यात सहभागी सर्वांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! ‘पाण्यात मासा पाणी कधी पितो आपल्याला कधीच कळत नाही, त्याप्रमाणे प्रशासनात भ्रष्टाचारी पैसे कसे आणि कधी खातात ? ते कळत नाही !’ – आर्य चाणक्य

‘इन्क्विझिशन’विषयी (धर्मच्छळाविषयी) विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे आवाहन गोमंतकियांना केले होते. यावरून तथाकथित विचारवंत, काँग्रेस पक्षातील काही नेते आदींनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

गोव्याला भविष्यात ‘योग भूमी’ म्हणून ओळखले जाईल ! – मुख्यमंत्री

या नियोजित तपोलोक योग क्षेत्राची वैशिष्ट्ये : सिंह द्वार, योग सेतू, योग स्तंभ, योग दालन, योग मंडळ, योग पथ, प्राणायाम क्षेत्र, अष्टांग योग क्षेत्र आणि गोमंतभूमी जनक ‘परशुराम’ची मूर्ती ! या प्रकल्पासाठी एकूण  ३३ कोटी ६८ लाख रुपये खर्च येणार आहे.

आध्यात्मिक सौंदर्य आणि समृद्धता अनुभवली नसेल, तर भारताची भेट अपूर्ण राहील ! – मंत्री जी. किशन रेड्डी

आमच्याकडे ५० हून अधिक शक्तीपीठे आहेत, जिथे महिलांच्या दैवी सामर्थ्याची पूजा केली जाते. भारत हे शीख धर्माचे जन्मस्थान आहे आणि आमच्याकडे अमृतसर इथे शीख सुवर्ण मंदिर आहे, जे बंधुत्व आणि समतेचे प्रतीक आहे.

रूमडामळ (मडगाव – गोवा) येथील पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण

अन्य राज्यांप्रमाणे आता गोव्यातही हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे होत आहेत. धर्मांध वरचढ होण्यापूर्वीच हिंदूंनी यावर संघटितपणे उपाययोजना काढायला हवी !

गोवा : क्रांतीलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

गोवा मुक्तीच्या ६० वर्षांत क्रांतीलढ्याचा इतिहास, कुंकळ्ळीवासियांचा लढा, इन्क्विझिशनचा भयानक इतिहास पाठ्यपुस्तकात अंतर्भूत न होणे दुर्दैवी ! स्वातंत्र्यसेनानी टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्‍हास’ झाल्याचे म्हटले, ते योग्यच होते !

तिलारी धरणाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता !

महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या  तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या (धरणाच्या) कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास १७ जून या दिवशी झालेल्या ‘तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प नियंत्रण मंडळा’च्या ६ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

‘विकसित भारत २०४७’चे उद्दिष्ट गोवा सर्वांत अगोदर गाठणार ! – ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोवा विधानसभा सभागृहात आजी-माजी आमदार, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य यांना ‘विकसित भारत  २०४७ : लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर संबोधित केले.

पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करून नवीन गोवा सिद्ध करा !

बेतुल किल्ल्यावर ६ जून या दिवशी आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आवाहन केले.

मराठी, कोकणी आणि संस्कृत वगळण्याचा निर्णय मागे घ्या ! – ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’ची मागणी

आतापर्यंत असलेले त्रिभाषा अन् द्विभाषा सूत्रांचे उच्चाटन करून इंग्रजी ही एकमेव भाषा टिकवून ठेवून कोकणी, मराठी, संस्कृत, उर्दू आदी भारतीय भाषा राज्यातून नाहीशा करण्याचा निर्णय गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाने घेतला आहे.