३ मुलींची हत्या करणार्‍या बिहारमधील जोडप्याला अटक !

बिहारमधील कटिहार येथील एक जोडपे त्यांच्या ४ मुली आणि १ मुलगा यांसह कानपूर, जालंधर येथे रहात होते. या जोडप्याने स्वत:च्या ३ मोठ्या मुलींना विष मिसळलेले दूध प्यायला दिले. तिन्ही मुलींचा तडफडून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना अटक केली आहे.

आसामच्या ५ आदिवासी मुसलमान समाजाचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण होणार !

यामुळे या समाजाच्या विकासासाठी पावले उचलता येतील, असे आसाम सरकारकडून अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.

शाकाहारी भोजनाच्या पटलावर मांसाहार करणार्‍या विद्यार्थ्याला १० सहस्र रुपयांचा दंड !

शैक्षणिक संस्थेतील नियमांचा भंग करणार्‍यांना अशाच प्रकारे शिक्षा करायला हवी !

‘ईडी’ची कारवाई सूड घेण्याच्या भूमिकेतील नसावी ! – सर्वोच्च न्यायालय

अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) पारदर्शक, निष्पक्षता आणि सत्यतेचे मूलभूत मापदंड यांचे पालन केले पाहिजे. ‘ईडी’ची कारवाई सूड घेण्याच्या भूमिकेतून नसावी. तसेच अटकेचे कारण दाखवण्यासाठी केवळ कोठडीचा आदेश देणे पुरेसे नाही.

(म्हणे) ‘आमचे राजनैतिक अधिकारी भारतात रहाणे कॅनडासाठी महत्त्वाचे !’ – पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

यासाठी कॅनडाने प्रथम त्याच्या देशातील खलिस्तानी आतंकवाद्यांना भारताच्या हवाली केले पाहिजे. तसेच तेथील खलिस्तानी चळवळ मोडून काढली पाहिजे. या दोन्ही गोष्टी ट्रुडो करू शकत नसल्याने कॅनडाच्या अधिकार्‍यांची हकालपट्टी आवश्यकच आहे !

सिक्कीममध्ये ढगफुटी : तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे हाहा:कार !

सिक्कीममध्ये ४ ऑक्टोबरच्या रात्री दीड वाजता अचानक आलेल्या पुरामुळे हाहा:कार माजला. उत्तर सिक्किममधील ल्होनाक तलावाच्या वर ढगफुटी झाल्याने लाचेन खोर्‍यातील तिस्ता नदीची पाणी पातळी तब्बल १५-२० फुटांनी वाढली. या पुरामुळे भारतीय सैन्याचे २३ सैनिक बेपत्ता झाले.

पोलिसांकडून धर्मांध मुसलमानांवर कारवाई होत नसल्यावरून हिंदूंचा संताप !

कर्नाटकात काँग्रेस सरकार असल्यामुळेच अशी स्थिती आहे, हे आता काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंनी लक्षात घ्यावे !

‘पाकिस्तान अन्टोल्ड’ संघटनेने घेतले १ सहस्र २०० हिंदु शरणार्थी मुलांना दत्तक !

विनामूल्य शिक्षण देण्याची केली व्यवस्था !
अर्थसाहाय्य करण्याचे केले हिंदूंना आवाहन !

उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, ए. राजा, निखिल वागळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा !

हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या प्रकरणी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार !

कुरीग्राम (बांगलादेश) येथे राधापद रॉय या ८० वर्षीय साधूवर जीवघेणे आक्रमण !

इस्लामी बांगलादेशात सातत्याने होत आहेत हिंदु धर्म आणि हिंदु साधू-संत यांच्यावर आक्रमणे !