पूर्वजांचे त्रास दूर होण्‍यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

‘सध्‍या अनेक साधकांना अनिष्‍ट शक्‍तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२९ सप्‍टेंबर ते १४ ऑक्‍टोबर २०२३ या काळात) हा त्रास वाढत असल्‍याने त्‍या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप न्‍यूनतम १ घंटा करावा.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील साधकांनी केलेला सूक्ष्मातील एक प्रयोग, त्‍याचे विश्‍लेषण आणि निष्‍कर्ष !

साधकांना एक पाकीट दिले आणि त्‍यांना ‘ते पाकीट नमस्‍काराच्‍या मुद्रेतील हातांमध्‍ये २ मिनिटे धरून काय जाणवते ?’, हे अभ्‍यासायला सांगितले. नंतर त्‍यांना दुसरे एक पाकीट देऊन ‘तेही वरीलप्रमाणे नमस्‍काराच्‍या मुद्रेत २ मिनिटे धरून काय जाणवते ?’, हे अभ्‍यासायला सांगितले.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘आपल्‍या आयुष्‍यात प्रारब्‍धानुसार समोर येईल त्‍या चांगल्‍या आणि वाईट प्रसंगांना तोंड देत रहाणे’, म्‍हणजेच आयुष्‍य जगणे’, असे मला वाटते. ‘कितीही संकटे आली, तरी त्‍यांपासून दूर न पळता त्‍यांना धिराने सामोरे जाऊन त्‍यातून तावून-सुलाखून बाहेर निघणे’, हा जगण्‍याचा एक उत्तम मार्ग आहे….

रत्नागिरी येथील आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे आणि सौ. कल्‍याणी शहाणे यांना ‘श्रौत अग्‍निहोत्र’ घेतांना (व्रत अंगीकारतांना) झालेले त्रास आणि आलेल्‍या अनुभूती

अग्‍निहोत्र घेण्‍यासाठीच्‍या विधींना आरंभ झाल्‍यावर शरिराला हलकेपणा जाणवत होता. ‘मी एका वेगळ्‍याच वातावरणात आहे’, असे वाटत होते.

देवा, तूच असशी माय-बाप, धनी ।

‘श्री गुरूंचे रूप पहाण्‍यासाठी मन आतुरलेले असते. त्‍यांना पाहिल्‍यावर मनाची स्‍थिती एकदम पालटून जाते. केवळ दर्शनमात्रे कृपावर्षाव करणार्‍या श्री साईंच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

वर्ष २०२२ मधील गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी साधकांना आलेल्‍या अनुभूती !

सर्व साधकांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा सामूहिक नामजप करायला सांगितल्‍यावर कृतज्ञता व्‍यक्‍त झाली आणि नामजप माझ्‍या पितरांपर्यंत पोचत असून ते मला आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवत होते. तेव्‍हा नामजप भावपूर्ण होत होता.

सनातन धर्म म्‍हणजेच ईश्‍वर होय !

नको राग नको कुणाचा हेवा । शिकायचे अध्‍यात्‍म हाच ठेवा ॥ सनातनची कीर्ती जगी करूया । हेचि दान आम्‍हा देगा देवा ॥

पसायदान हा ज्ञानेश्वरीच्या उत्तुंग देवालयावरील कांचनाचा कळस !

‘ज्ञानेश्वरी’चा वाचन प्रवास हा हिरेमाणकांनी खचलेल्या; पण पुरेसा प्रकाश नसलेल्या रत्नगुहेतील प्रवास आहे. तो प्रवास संपवून आपण पसायदानापाशी येतो. तेव्हा ‘चैत्रातील सुंदर सोनेरी सकाळ आपल्याभोवती उजाडते आहे’, असे वाटते.