मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू !

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने राज्यातील गावांमध्ये नेते आणि मराठा आंदोलक यांच्यात वाद वाढत आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना समाजाच्या रोषालाही सामोरे जावे लागले; मात्र आमदार नीलेश लंके यांना कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही.

अंतरवाली सराटी (जिल्हा जालना) येथे आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली !

२९ ऑक्टोबरपासून गावागावात ‘आमरण उपोषण चालू करा’, असे आवाहन मराठा समाजाला करून ‘कुणाचा जीव गेल्यास सरकार उत्तरदायी राहील’, अशी चेतावणीही त्यांनी जालना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मिरज येथे मंत्री सुरेश खाडे यांच्या वाहनांचा ताफा अडवला !

शासनाकडून आरक्षणाचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत खाडे यांना जिल्हाबंदी करण्यात आल्याचे आंदोलकांनी घोषित केले. येथून पुढे सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना जिल्हाबंदी करण्यात येणार आहे, असे ‘मराठा क्रांती मोर्चा’चे राज्य समन्वयक विलासराव देसाई यांनी सांगितले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांना ठार मारण्याची धमकी !

एका अज्ञात व्यक्तीने त्यांना ‘इ-मेल’ पाठवून २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. ‘हे पैसे न दिल्यास देशातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांकडून तुम्हाला मारून टाकू’, असे धमकी देणार्‍याने सांगितले आहे.

जीवनातील शाश्वत आनंदासाठी नर्मदा परिक्रमा ! – मिलिंद चवंडके

नर्मदेची पायी परिक्रमा हे सर्वांग सुंदर धार्मिक व्रत-तपश्चर्या आहे. आपली पूर्वपुण्याई असेल, तरच नर्मदामैय्या परिक्रमा करू देते. परिक्रमा श्रद्धेने केल्यास जीवनातील शाश्वत आनंदाची प्राप्ती होते.

कार्ला येथील श्री एकवीरादेवी मंदिर परिसराचा विकास लवकरच होईल ! – डॉ. नीलम गोर्‍हे

श्री एकवीरादेवी मंदिराच्या पायर्‍यांची दुरुस्ती, ‘रोप वे’, भक्त निवास यांसह इतर पायाभूत सुविधांसाठी ‘एम्.एस्.आर्.डी.सी.’कडे (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) दायित्व सोपवले आहे.

‘युवा संघर्ष यात्रा’ स्थगित करण्याचा रोहित पवार यांचा निर्णय !

‘गावबंदीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवत आहात काय ?’ या प्रश्नावर पवार म्हणाले की, गावबंदीच्या निर्णयामुळे ‘यात्रा’ स्थगित केली नाही. ज्यांच्यासाठी ही यात्रा काढली, तेच युवा अस्वस्थ असतांना ही यात्रा चालू ठेवणे योग्य नाही.

गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर रोगराई होण्यासारखे प्रदूषण ! – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल

केवळ अहवाल नको. प्रदूषणासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई व्हायला हवी, तरच या अहवालांना अर्थ आहे, अन्यथा प्रशासनाने कागदी घोडे नाचवल्यासारखे होईल !

विविध नेत्यांनी केलेल्या ‘हेट स्पीच’च्या विरोधात हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील पोलीस ठाण्यात तक्रार !

उदयनिधी स्टॅलीन, ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माविषयी..

भारत सरकारने माजी अधिकार्‍यांची सुटका करावी !

भारत सरकारने या माजी नौसैनिकांची सुटका करावी, अशी मागणी ‘सातारा जिल्हा माजी नौसैनिक असोसिएशन’ने निवेदनाद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे.