(म्हणे) ‘मुंबई केंद्रशासित करा !’

मुंबई केंद्रशासित म्हणून घोषित करा, अशी मागणी कर्नाटकचे उच्च शिक्षणंत्री सी.एन्. अश्‍वथ्य नारायण यांनी केली आहे. कायदामंत्री माधू स्वामी आणि विधान परिषदेतील आमदार लक्ष्मण सौदी यांनीही अशीच मागणी केली.

पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती स्थिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी देहलीहून त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कर्णावती येथे पोचले आणि रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

बाडमेर (राजस्थान) येथे हिंदु धर्मग्रंथांची पाने फाडून जाळल्याच्या प्रकरणी ३ जणांना अटक

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या धर्मग्रंथांचा, देवतांचा नेहमीच अवमान होत असतो आणि हिंदूंवर आक्रमण होत असतात. हे लक्षात घेऊन अशा सरकारला घरी बसवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !

सोलापूरमधील गोवंश हत्येविषयी होणार उच्चस्तरीय चौकशी !

‘सोलापूर एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या पशूवधगृहाने बांधकामाची अनुमती घेतली आहे का ? प्रदूषण नियंत्रणाविषयीचे नियम पाळले जात आहेत का ? तसेच गोवंशांची हत्या होत आहे का ? याविषयी उच्चस्तरीय चौकशी करून १ मासात अहवाल सादर केला जाईल.

विदेशातून चालणारा ऑनलाईन जुगार रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक पालट करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

भारतात चालत असलेल्या काही ऑनलाईन लॉटरीला अमेरिका, नेपाळ आदी देशांतून ‘होस्टिंग’ (ऑनलाईन नियंत्रण ठेवणे) केले जात आहे. विदेशातून नियंत्रित करण्यात येत असल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय दंड विधान, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा आणि लॉटरी प्रतिबंधक कायदा या कायद्यांद्वारे कारवाईला मर्यादा येत आहेत.

शिक्षक पात्र परीक्षा भरतीप्रक्रियेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची गृहमंत्र्यांची घोषणा !

अपात्र आस्थापनांना पात्र केले नसते, तर घोटाळा झाला नसता. या आस्थापनांना पात्र करण्याचा निर्णय कुणी दिला ? याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

शालेय पोषण आहाराच्या पुरवठ्यामध्ये अयोग्य प्रकार चालू आहे का ?, याची पडताळणी करू ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

शालेय पोषण आहाराच्या अन्न तपासणीची यंत्रणा अत्यंत कुचकामी आहे. त्यामुळे सक्षम तपासयंत्रणा शासनाने निर्माण करावी. राज्यात पोषण आहार पुरवठ्यामध्ये काही भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे साटेलोटे आहे.

बुद्धीप्रामाण्यवादी आणि साधक यांच्यातील भेद !

‘बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे प्राण्यांप्रमाणे स्वेच्छेने वागणारे, तर साधक म्हणजे परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागणारे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना अनुकूल राज्यव्यवस्था होण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लोकशाही मार्गाने हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.