मुंबई पुन्हा दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर ?

मुंबई पुन्हा दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर आहे का ?, असा प्रश्‍न सध्या उपस्थित होत आहे. कारण कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन करून १५ दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रहित करा, अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

कोटी कोटी प्रणाम !

• श्री चंद्रशेखरानंद यांची आज पुण्यतिथी, मध्यप्रदेश
• सनातनचे सद्गुरु(डॉ.) वसंत (अप्पा) आठवले यांची आज पुण्यतिथी

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा आणणे राज्यघटनाविरोधी !

राजस्थानचे काँग्रेसी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम ! मुसलमान हिंदु नाव धारण करत हिंदु तरुणींची फसवणूक करतात याला गेहलोत प्रेम समजतात का ? जर नाही, तर ते याच्या विरोधात तोंड का उघडत नाहीत ?

दलितांसाठी सरकारी केशकर्तनालय उघडावीत !

रोगापेक्षा उपचार भयंकर ! अशा प्रकारची सरकारी केशकर्तनालये उघडण्यापेक्षा समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत; मात्र मतांसाठी जाणीवपूर्वक जातीभेद कायम ठेवणारे राजकारणी असे कदापि होऊ देणार नाहीत, हेही तितेकच खरे !

(म्हणे) ‘हिंदु कायद्यान्वये समलैंगिक विवाहाला मान्यता द्या !’

हिंदु विवाह कायदा हा भारतीय राज्यघटनेने बनवला असला, तरी हिंदु धर्मशास्त्रानुसार अशा प्रकारच्या विवाहाला संमती नाही. त्यामुळे याचा न्यायालयाने विरोधच केला पाहिजे, असे धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

श्रीलंकेमध्ये लिट्टेच्या मृत कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम करण्यावर न्यायालयाकडून बंदी  

श्रीलंकेतील २ न्यायालयांनी लिट्टेच्या कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. हे दोघे कार्यकर्ते श्रीलंकेच्या सैन्यासमवेत झालेल्या युद्धामध्ये ठार झाले होते.

उत्तरप्रदेश सरकारकडून ‘लव्ह जिहाद’विरोधातील कायद्यासाठी विधी विभागाकडे प्रस्ताव सादर

उत्तरप्रदेश राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात असा कायदा करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाला पाक सीमेवर तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक

पंजाब पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या रवींद्र सिंह या सैनिकाला पाकसाठी शस्त्र आणि अमली पदार्थ यांची तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे.

नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यावर गोव्यात कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी !

देणगीचे हे पैसे शिक्षण, युवकांना रोजगार, सामूहिक कृषी लागवड, आरोग्य रक्षण, क्रीडा सुविधांमध्ये सुधारणा आदींवर खर्च केल्यास योग्य झाले असते. या देणगीचा शेवटी प्रतिमादहन करून धूरच होत असतो. मुलांना योग्य ते देण्याची आता वेळ आली आहे.

तीन दिवसांत वीजदेयक सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात आंदोलन करणार ! – अतुल भातखळकर, भाजप

महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीजदेयकांच्या सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू, अशी चेतावणी भाजपचे मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिली आहे.