कोल्हापूर येथील सी.पी.आर्. रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार चालू !

सी.पी .आर्. रुग्णालयात मागील ६ मासांहून अधिक काळ बंद असलेली वैद्यकीय उपचार सेवा चालू झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.  

बेळगाव येथे मराठी फलकाला फासले काळे !

मराठा विकास प्राधिकरण स्थापनेविषयी मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकाला २० नोव्हेंबर या दिवशी कन्नड भाषिकांनी काळे फासले.

कोरेगाव पोलिसांकडून गांजा तस्करांविरोधात धडक मोहीम

कोरेगाव पोलिसांनी गत आठवड्यापासून तालुक्यातील गांजा तस्करांविरोधात धडक मोहीम चालू केली आहे.पोलिसांनी संशयिताकडून ३ लाख रुपयांचा ४९ किलो गांजा कह्यात घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार्‍या शासकीय महापूजेला वारकरी पाईक संघाचा विरोध

कार्तिकी वारीसाठी वारकर्‍यांना बंदी असेल तर आमचाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार्‍या शासकीय महापूजेला विरोध राहील, तसेच येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी सांगितले.

शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानच्या आक्रमणात कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक संग्राम पाटील हुतात्मा !

शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने केलेल्या आक्रमणात राजौरी येथे करवीर तालुक्यातील निगवे-खालसा येथील हवालदार संग्राम पाटील (३७ वर्षे) हे २१ नोव्हेंबर या दिवशी हुतात्मा झाले आहेत. ते गेली १७ वर्षे मराठा बटालीयनमध्ये सेवा बजावत होते.

कोरोनामुळे कार्तिकी यात्रा जिल्हा प्रशासनाने केली रहित !

वाढत्या कोरोना संसर्गामुळे या वर्षीची कार्तिकी यात्रा जिल्हा प्रशासनाने रहित केली आहे.श्री विठ्ठलाची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ८ सहस्र विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी !

निकालामध्ये चुका का राहिल्या आहेत, हे विद्यापिठाने सांगायला हवे. यामध्ये दोषी असणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. काही केले तरी यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाची हानी कधीही भरून निघणार नाही.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा तूर्तास नाहीच – महापालिका आयुक्त

देहलीमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. मुंबईतही परिस्थिती चिंताजनक होतांना दिसत आहे. पाच मासांनंतर मुंबईत रुग्णसंख्या वाढली असून, दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हिंदुत्व सहिष्णू असल्यामुळे ओवैसींवर भारतात अद्यापपर्यंत आक्रमण झाले नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

हिंदुत्व हे कधीच कट्टर असू शकत नाही. हिंदुत्व हे सहिष्णू आहे. हिंदुत्वाने कधीच कुणावर आक्रमण केले नाही. त्यामुळेच भारतात सर्व धर्माचे लोक सुख आणि समाधानाने नांदत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाच्या १ कोटी चाचण्या झाल्या

राज्यात २० नोव्हेंबर या दिवशी ६ सहस्र ९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याने १ कोटी चाचण्यांचा टप्पा ओलांडला. राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ४२ सहस्र ९१६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.