‘अ‍ॅमेझॉन प्राईम’कडून विनाअट क्षमायाचना !

हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम ! अ‍ॅमेझॉन प्राईम आणि अन्य ओटीटी मंचांकडून सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या वेब सिरीज प्रसारित झाल्या असल्याने केवळ क्षमायाचना मागितल्याने त्यांना सोडून देण्यात येऊ नये. अशांना शिक्षा होण्यासाठीच प्रयत्न झाले पाहिजेत, तेव्हाच त्यांच्यावर वचक बसेल !

दळणवळण बंदीच्या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कह्यात घेतली ११७ एकर भूमी !

देवस्थानाला भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या भूमीविषयी असा गैरकारभार हे सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. म्हणून मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

‘तांडव’ वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांची क्षमायाचना

‘जफर यांनी क्षमा मागितली असली, तरी जोपर्यंत या वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकले जात नाहीत, तोपर्यंत विरोध चालूच रहाणार’, असे हिंदू आणि त्यांच्या संघटनांनी म्हटले आहे.

‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची अ‍ॅमझॉनची सिद्धता

अ‍ॅमेझॉनने मनसेच्या विरोधात याचिका केली आहे. त्यावर न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काही पदाधिकारी यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या पुणे आणि मुंबई येथील कार्यालयांची तोडफोड केली. यामुळे आता अ‍ॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेतली आहे.

पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी गुरुवायूर मंदिराकडून घेतलेले १० कोटी रुपये परत द्या !

केवळ पैसेच परत घेऊ नयेत, तर असा निर्णय घेणार्‍यांना न्यायालयाने दंड ठोठावला पाहिजे. जर यापूर्वीही अशा प्रकारे मंदिराचे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले गेले असतील, तर तेही परत घेण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !

‘हिंदु राष्ट्र सेने’च्या धाकामुळे तुळजापूर तहसील कार्यालयातील उर्दू भाषेतील फलक हटवला !

महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असतांना उर्दू भाषेत फलक प्रसिद्ध करणे म्हणजे पुन्हा एकदा मोगल आणि निजाम यांची सत्ता स्थापन करण्याचे षड्यंत्र तर नाही ना ? 

‘कल्पवृक्ष’ आस्थापनाने संकेतस्थळावरील विक्रीतून म.फि. हुसेन यांची चित्रे वगळली !

हिंदूंनी वैध मार्गाने संघटितपणे विरोध केल्यास यश मिळते याचे हे आणखी एक उदाहरण ! याविषयी हिंदूंनी ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी !

‘हिंदु राष्ट्र सेने’च्या धाकामुळे तुळजापूर तहसील कार्यालयातील उर्दू भाषेतील फलक हटवला !

उर्दू ही राज्य किंवा राष्ट्र भाषा नाही. तरीही असे फलक छापून ते तहसील कार्यालयात लावण्यामागील सरकारचा हेतू काय आहे, हे जनतेला समजले पाहिजे. याविषयी सरकारने लेखी स्वरूपात आपला खुलासा करावा.

उत्तराखंडमधील भाजप शासन आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना ५० सहस्र रुपये देण्याचा निर्णय रहित करणार

उत्तराखंडमधील भाजप शासन अन्य धर्मामध्ये विवाह करणार्‍या दांपत्याला ५० सहस्र रुपये प्रोत्साहन स्वरूपात देण्याची योजना रहित करणार आहे. हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर टीका केल्यामुळे आता ही योजना केवळ आंतरजातीय जोडप्यांनाच लागू होईल.

सनातनचे हितचिंतक आणि धर्मप्रेमी उद्योजक श्री. संजय ठाकूर यांची करणी सेनेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

हिंदूंचे संघटन करण्यासाठी देवाने मला दिलेली ही संधी आहे आणि तिचा मी पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहे.= श्री. संजय ठाकूर