‘जय श्रीराम’ म्हटल्याने कुणाचीही धर्मनिरपेक्षता धोक्यात येत नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

‘‘जय श्रीराम’ ऐकायला आणि म्हणायला या देशात कुणालाही त्रास व्हायला नको. प्रभु श्रीराम हे या देशाची अस्मिता आणि आधार आहेत. ‘जय श्रीराम’ हा काही राजकीय शब्द नाही. हा आमचा श्रद्धेचा विषय आहे.

रामाचे नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवे, गळा दाबून नाही ! – तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ

नुसरत जहाँ यांनी हाच सल्ला ममता बॅनर्जी यांना दिला पाहिजे ! या देशात रहाणार्‍यांनी ‘जय श्रीराम’ म्हणण्यासह जे म्हणत आहेत, त्यांना साथ दिली पाहिजे; मात्र ममता बॅनर्जी ना ‘जय श्रीराम’ म्हणत आहेत, ना अन्य कुणी म्हटले, तर ते त्या स्वीकरत आहेत.

श्रीरामाचा अपमान !

श्रीराम भारताचा आत्मा आहे, देशाचा गौरव आहे. भारतमाता ही देशाची ओळख आहे. कुणाही भारतियासाठी या घोषणांनी छाती फुलून येते, शरिरातील पेशीपेशी रोमांचित होते, धर्म आणि राष्ट्र कार्य करण्याची प्रेरणा जागृत होते, कठिणातील कठीण काम नक्की सुटेल असा आत्मविश्‍वास येतो.

‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाषण करण्यास नकार !

स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी यांना मुसलमानांचे लांगूलचालन केलेले चालते; मात्र श्रीरामाचा जयजयकार चालत नाही. यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो !

शीख पंथाला हिंदु धर्मापासून वेगळे करू पहाणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

शीख पंथाला हिंदु धर्मापासून वेगळे करू पहाणार्‍यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, श्रीराममंदिराच्या आंदोलनात पहिली ‘एफ्.आय.आर्.’ हिंदूंविरुद्ध नव्हे, तर शिखांविरुद्ध झाली होती. यावरून ‘शीख हे सनातन हिंदु धर्माचे अभिन्न अंग आणि धर्मरक्षक योद्धा आहेत’, हे सिद्ध होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सर्वप्रथम ५ लाख १०० रुपयांचे दान !

अयोध्येत उभारल्या जाणार्‍या श्रीराममंदिरासाठी निधी समर्पण अभियानाला १५ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आला. या कार्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सर्वप्रथम ५ लाख १०० रुपयांचा निधी समर्पित करत या अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

श्रीरामंदिरासाठी अर्पण गोळा करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर विकले गेलेले मुसलमान दगडफेक करतील आणि त्याचा भाजप राजकीय लाभ उठवेल !

असा दावा करून हसन दगडफेक करणार्‍या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही !

काँग्रेसशासित राज्यांतील शेतकर्‍यांकडून होणारे आंदोलन कृषी कायद्याविरोधात नाही, तर सीएए, एन्.आर्.सी. आणि श्रीराममंदिराचे दुःख ! – साक्षी महाराज, खासदार, भाजप

उगाच आपला राग शांत करण्यासाठी कृषी कायद्यावरून आरडाओरड केला जाते, अशी टीका भाजपचे येथील खासदार साक्षी महाराज यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनावर केली.

सामाजिक न्याय !

याच देशात मर्यादापुरुषोत्तम, एकवचनी, एकपत्नी प्रभु श्रीराम यांनीही राज्य केले आहे. आदर्श राज्यकारभाराचा वस्तूपाठच त्यांनी घालून दिला आहे. कुठे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आणि कुठे सध्याचे राजकारणी ? यावरून तरी देशात रामराज्याची अर्थात् हिंदु राष्ट्राची का आवश्यकता आहे, ते लक्षात येते !

ताजमहालमध्ये हिंदु युवा वाहिनीच्या कायर्कर्त्यांनी भगवा फडकावत दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा

सरकारने तेजोमहालया (ताजमहाला) विषयीचे सत्य जनतेसमोर आणल्यास अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. तेजोमहालयाशी हिंदूंच्या श्रद्धा आणि भावना जोडलेल्या असल्याने सरकारने हे सत्य जनतेसमोर आणण्याचे धारिष्ट्य दाखवले पाहिजे !