मोक्षदायिनी गंगेचे अलौकिकत्व आणि माहात्म्य अन् रक्षणाचे उपाय सांगणारे सनातनचे ग्रंथ !

♦ पापनाशक गंगा नदी म्हणजे विश्वातील सर्वाेत्तम तीर्थ !
♦ गंगास्नानाचे महत्त्व, गंगास्नानविधी आणि गंगापूजनविधी !
♦ गंगा देवीशी संबंधित उत्सव आणि व्रते अन् उपासनाशास्त्र !

गंगानदी कधीही कोरडी पडणार नाही ! – संशोधनाचा निष्कर्ष

गंगानदीचे स्रोत असणार्‍या गंगोत्रीमधील बर्फाचे डोंगर पुढील ३ सहस्र वर्षे रहाणार आहेत; कारण येथे प्रतिवर्ष बर्फ पडतच असतो.

ब्रह्मलोक आणि सूर्यमंडल यांच्या प्रकाशित भारतात गंगा, यमुना अन् सरस्वती या जलस्रोतांना आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त असणे

आध्यात्मिक स्तरावर ज्याप्रमाणे मानव देहातील इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांना सर्वाेत्तम महत्त्व आहे, तसेच या धरणीला या तीन जलस्रोतांचे महत्त्व आहे. आधिदैविक दृष्टीने ब्रह्मा, विष्णु आणि महेश या संज्ञेला महत्त्व आहे, तेच जल (सोम), सूर्य आणि अग्नी असे या जलस्रोतांना महत्त्व आहे.

गंगानदीच्या घाटावर अहिंदूंना प्रवेश नसल्याची सूचना देणारे फलक तक्रार नसतांनाही पोलिसांनी काढले !

तक्रार नसतांनाही फलक काढण्याची ‘तत्परता’ दाखवणारे पोलीस हिंदूंनी तक्रार केल्यावर मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ करतात, हे लक्षात घ्या ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

प्रदूषित यमुनेवरील श्रद्धा !

हिंदु धर्मियांमध्ये एकीकडे धर्माचरण अल्प होत असतांना अजूनही पूजेसाठी काही महिला अशा प्रकारचा भाव ठेवून प्रदूषित नदीमध्ये पूजा करत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. ते नाकारताही येणार नाही. या महिलांचे त्यांच्या भावामुळे देव रक्षण करील, त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवील.

श्रीक्षेत्र कळंब (यवतमाळ) येथील चिंतामणी देवालयाच्या भुयारातील गाभार्‍यात २६ वर्षांनंतर गंगेचे आगमन !

महाराष्ट्रातील २१ श्री गणेश क्षेत्रांपैकी एक असलेल्या आणि इंद्रदेवाच्या घोर तपस्येने प्रकट झालेल्या श्रीक्षेत्र कळंब येथील चिंतामणी देवालयाच्या भुयारातील गाभार्‍यात २६ वर्षांनंतर गंगेचे आगमन झाले. कोरोना संसर्गामुळे बंद असलेले मंदिर ७ ऑक्टोबर या दिवशी उघडल्यावर भाविकांनी गाभार्‍यात प्रवेश केला. तेव्हा भाविकांना…

गंगानदीच्या पाण्यामध्ये ‘कोरोना’चा विषाणू जिवंत राहू शकत नाही ! – संशोधकांचा निष्कर्ष

गंगाजलापासून ‘कोरोनाविरोधी औषध’ बनवण्यावर संशोधन चालू !
गंगानदीच्या पावित्र्यावर शंका घेणारे, तसेच तिच्यावर श्रद्धा असणार्‍या हिंदूंना वेड्यात काढणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांना ‘उत्तरप्रदेश रत्न’ पुरस्कार प्रदान !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी गंगा नदीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानानिमित्त त्यांना ‘उत्तरप्रदेश रत्न’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.