गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या ७ पवित्र नद्यांचे महत्त्व !

शतकाआधीची नर्मदा आजही तशीच आहे, पावन आणि विपुल ! तशीच ती पुढेही राहील. ‘पुण्या सर्वत्र नर्मदा ।

गंगा माहात्‍म्‍य

‘गमयति भगवत्‍पदमिति गङ्‍गा ।’
अर्थ : स्नान करणार्‍याला भगवत् पदापर्यंत पोचवते ती गंगा !
‘गम्‍यते प्राप्‍यते मोक्षार्थिभिरिति गङ्‍गा ।’  शब्‍दकल्‍पद्रुम
अर्थ : मुमुक्षु जिच्‍याकडे जातात, ती गंगा !

समस्त जिवांना मुक्ती आणि मोक्ष देऊन त्यांचा उद्धार करणार्‍या परम पावन गंगा नदीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

भारतातील प्रमुख सप्तनद्यांमध्ये गंगा नदीला अग्रस्थान प्राप्त आहे. ज्याप्रमाणे श्री दुर्गादेवी शक्तीचे, श्री सरस्वतीदेवी ज्ञानाचे आणि श्री महालक्ष्मीदेवी धन अन् ऐश्वर्य यांचे प्रतीक आहेत, तसेच पावित्र्य अन् दिव्यता यांचे प्रतीक श्री गंगा नदी आहे.

गंगा नदीचे आध्‍यात्मिक सामर्थ्‍य

गंगा ही केवळ नदी नसून ती श्रेष्‍ठतम तीर्थदेवता आहे. त्‍यामुळे भारतियांसाठी गंगा प्राणांहूनही प्रिय ठरते. भाविकांची पापे धुण्‍याचे आध्‍यात्‍मिक कार्य ईश्‍वरानेच तिला वाटून दिलेले आहे. गंगा स्नानाने शुद्ध करते, तर नर्मदा नदी नुसत्‍या दर्शनानेच मानवाला शुद्ध करते.

गंगाजलावर वैज्ञानिक संशोधन

गंगाजल अत्यंत स्वच्छ आणि पवित्र आहे. यामध्ये रक्तातील ‘हिमोग्लोबीन’ वाढवण्याची शक्ती आहे.

गंगा नदीचे महत्त्व !

पद्मपुराणात उल्लेख आहे की, ज्‍याप्रमाणे अग्‍नीच्‍या तडाख्‍यात सापडल्‍यानंतर रूई आणि कोरडी पाने क्षणार्धात भस्‍मसात होतात, त्‍याच प्रकारे गंगा नदी तिच्‍या जलाच्‍या स्‍पर्शाने मनुष्‍याचे सारे पाप एका क्षणात नष्‍ट करते.

श्री गंगेचे अनुभवसिद्ध देवत्‍व !

भारतात नदीला ‘लोकमाता’ ही संज्ञा आहे. आरंभीच्‍या अवस्‍थेत नदीच्‍या आश्रयानेच गावे वसत; म्‍हणून तिला ‘लोकमाता’ हे सार्थ नाम ! गंगाजलाच्‍या अद़्‍भुत आणि विलक्षण वैशिष्‍ट्यांमुळेच गंगा विश्‍वमान्‍य लोकमाता झालेली आहे. गंगा वरपांगी इतर मोठ्या नद्यांसारखीच दिसत असली, तरी ‘तिचे अंतरंग वैज्ञानिकांनीही मानावे’, अशा दिव्‍य स्‍वरूपाचे आहे.

गंगा नदी अखंड वहाण्‍यासाठी पर्यावरण रक्षणाचा संकल्‍प करा !

गंगेचा प्रवाह अखंड वहाता ठेवल्‍यास आर्थिक लाभ तर होतीलच, तसेच गंगेचे पावित्र्य टिकून तिच्‍यामुळे राष्‍ट्रीय अस्‍मिता आणि एकात्‍मता दृढ होईल.

गंगा नदीच्या काठावरील तीर्थक्षेत्रे ही राष्ट्राच्या एकात्मतेचे आधारस्तंभ !

हरिद्वार, प्रयाग आणि काशी यांसारख्या तीर्थक्षेत्रांची पवित्रता गंगेच्या प्रवाहामुळेच जागृत आहे. गंगेचा जलस्तर न्यून झाल्यास कोट्यवधी लोकांच्या भावनांवर आणि श्रद्धेवर आघात केल्यासारखेच होईल.